शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आजरा ‘पाटबंधारे’चे तीन-तेरा

By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST

विभाजन केले : कामासाठी गडहिंग्लज, गारगोटीला जावे लागणार

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे कार्यालयाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. वास्तविक सदर कार्यालय गडहिंग्लज येथे होणार असतानाच अचानकपणे विभाजन करून दोन्ही कार्यालये कोल्हापूर येथेच ठेवण्यात आली आहेत. तर आजरा येथील पाटबंधारेचा बहुतांशी कारभार गारगोटी व गडहिंग्लजला जोडल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी परवान्यासह इतर कामांकरिता गारगोटी व गडहिंग्लजला खेटे मारावे लागणार आहेत.कोल्हापूर कार्यालयाकडे गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग, निढोरी उपविभाग, पंचगंगा पाटबंधारे कोल्हापूर कोडोली व भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी असा कार्यभार होता. या विभागाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. या प्रकारात आजरा तालुक्याचा काही भाग गडहिंग्लज तर काही गारगोटीत गेला आहे. यामुळे आजरा येथील पाटबंधारे कार्यालयाचा कर्मचारी आकृतिबंध विस्कटला आहे. १७ जागांपैकी ११ कर्मचारी इतरत्र हलविण्यात येत आहेत तर यामुळे केवळ ६ कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. नवीन उपविभागामुळे २० बंधाऱ्यापैकी केवळ ५ बंधाऱ्याचा कार्यभार आजरा कार्यालयाकडे ठेवण्यात आला आहे.चित्री ते ऐनापूरपर्यंतचा भाग आजरा कार्यालयाकडे राहणार आहे. तलाव लघुपाटबंधारे, सर्फनाला व आजरा पाटबंधारे अशी तीन कार्यालये आजरा येथे सुरू राहणार असल्याचे समजते. तलाव लघुपाटबंधारेची शाखा कागदोपत्री सुरू झाली आहे. पण कार्यालय कोठे, अधिकारी कोण , कर्मचारी किती, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.चांगले काम, नियोजन चांगले, वसुली चांगली अशी परिस्थिती असताना आजरा पाटबंधारे कार्यालयाचे तीनतेरा करण्यात आले आहेत. यातून शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमके काय साध्य करावयाचे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. घाटकरवाडीपासून साळगावपर्यंतच्या शेतकरी वर्गास आता गडहिंग्लज येथे कामासाठी जावे लागणार आहे. मुळातच आहे तो कर्मचारी वर्ग आजरा पाटबंधारे कार्यालयाकरिता अपुरा आहे. त्यातूनही अत्यंत गोपनीयता बाळगत कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागणी नाही... विरोधही नाही..!पाटबंधारे खात्याचे विभाजन, आजरा तालुक्यातील कार्यभार हलविण्याची मागणी कोणीही केली नाही तरीही हा अट्टहास का ? हा प्रश्न उपस्थित होत असला तरी याला प्रखर विरोधही होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.