शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:50 IST

जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबितमुख्यमंत्र्यांना निधी संदर्भात दिलेल्या अहवालातील माहिती

प्रवीण देसाईकोल्हापूर : जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.जिल्'ातील महापुरात शेतीसह घरे, गोठे, पशुधन, व्यापारी, आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा आकडा सुमारे ८५० कोटींचा आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी राष्ट्रीयआपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार मिळणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.त्यातील सुमारे ४५० कोटी रुपये हे घरांची पडझड, घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान, मृत पशुधन अनुदान, मृत व्यक्तींसाठी अनुदान या माध्यमातून मंजूर होऊन त्याचे वाटप सुरू आहे; परंतु अद्याप ४०९ कोटी ६१ लाख ४५ हजार रुपयांचा निधी सरकारकडे प्रलंबित आहे.यामध्ये नुकसानग्रस्त पिकांच्या कर्जमाफीसाठी २९५ कोटी ४८ लाख ६६ हजार रुपये, मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसाठी २ कोटी ६३ लाख ९ हजार रुपये निधी येणे आहे. त्याचबरोबर विविध शासकीय विभागांना पूरबाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळालेला नाही.

यात महावितरणसाठी ३६ कोटी १८ लाख ३४ हजार रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुलांसाठी १२ कोटी ५० लाख, आरोग्य विभागासाठी पाच कोटी ७१ लाख ५ हजार, पाटबंधारे विभागासाठी २ कोटी २२ लाख, महानगरपालिकेसाठी ८ कोटी ७ लाख, नगरपालिका ४ कोटी २३ लाख ४२ हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ५ कोटी ४८ लाख ९३ हजार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या मालमत्तेसाठी १७ कोटी ३८ लाख, जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी मालमत्तेसाठी १९ कोटी ७ लाख ४१ हजार रुपये निधीचा समावेश आहे.

पूरग्रस्त नुकसानीचा निधी तातडीने देऊजिल्'ात पुरग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या निधी व्यतिरिक्त अद्याप काही निधी प्रलंबित असून, सरकारने तो लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. १७) मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या

वेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पूरग्रस्तांना निधी आला किती? वाटप किती झाला? प्रलंबित किती आहे? याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासाने अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हा निधी लवकरात लवकर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर