शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:50 IST

जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबितमुख्यमंत्र्यांना निधी संदर्भात दिलेल्या अहवालातील माहिती

प्रवीण देसाईकोल्हापूर : जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.जिल्'ातील महापुरात शेतीसह घरे, गोठे, पशुधन, व्यापारी, आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा आकडा सुमारे ८५० कोटींचा आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी राष्ट्रीयआपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार मिळणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.त्यातील सुमारे ४५० कोटी रुपये हे घरांची पडझड, घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान, मृत पशुधन अनुदान, मृत व्यक्तींसाठी अनुदान या माध्यमातून मंजूर होऊन त्याचे वाटप सुरू आहे; परंतु अद्याप ४०९ कोटी ६१ लाख ४५ हजार रुपयांचा निधी सरकारकडे प्रलंबित आहे.यामध्ये नुकसानग्रस्त पिकांच्या कर्जमाफीसाठी २९५ कोटी ४८ लाख ६६ हजार रुपये, मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसाठी २ कोटी ६३ लाख ९ हजार रुपये निधी येणे आहे. त्याचबरोबर विविध शासकीय विभागांना पूरबाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळालेला नाही.

यात महावितरणसाठी ३६ कोटी १८ लाख ३४ हजार रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुलांसाठी १२ कोटी ५० लाख, आरोग्य विभागासाठी पाच कोटी ७१ लाख ५ हजार, पाटबंधारे विभागासाठी २ कोटी २२ लाख, महानगरपालिकेसाठी ८ कोटी ७ लाख, नगरपालिका ४ कोटी २३ लाख ४२ हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ५ कोटी ४८ लाख ९३ हजार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या मालमत्तेसाठी १७ कोटी ३८ लाख, जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी मालमत्तेसाठी १९ कोटी ७ लाख ४१ हजार रुपये निधीचा समावेश आहे.

पूरग्रस्त नुकसानीचा निधी तातडीने देऊजिल्'ात पुरग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या निधी व्यतिरिक्त अद्याप काही निधी प्रलंबित असून, सरकारने तो लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. १७) मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या

वेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पूरग्रस्तांना निधी आला किती? वाटप किती झाला? प्रलंबित किती आहे? याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासाने अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हा निधी लवकरात लवकर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर