शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:50 IST

जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त नुकसानीचे ४०९ कोटी सरकारकडून प्रलंबितमुख्यमंत्र्यांना निधी संदर्भात दिलेल्या अहवालातील माहिती

प्रवीण देसाईकोल्हापूर : जिल्'ात चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ८५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातील ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरणही सुरू आहे; परंतु अद्याप पीक कर्जमाफीसह मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसह इतर नुकसानीचा ४०९ कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप राज्य सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.जिल्'ातील महापुरात शेतीसह घरे, गोठे, पशुधन, व्यापारी, आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा आकडा सुमारे ८५० कोटींचा आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी राष्ट्रीयआपत्ती व्यवस्थापनाच्या निकषानुसार मिळणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.त्यातील सुमारे ४५० कोटी रुपये हे घरांची पडझड, घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान, मृत पशुधन अनुदान, मृत व्यक्तींसाठी अनुदान या माध्यमातून मंजूर होऊन त्याचे वाटप सुरू आहे; परंतु अद्याप ४०९ कोटी ६१ लाख ४५ हजार रुपयांचा निधी सरकारकडे प्रलंबित आहे.यामध्ये नुकसानग्रस्त पिकांच्या कर्जमाफीसाठी २९५ कोटी ४८ लाख ६६ हजार रुपये, मत्स्यव्यावसायिकांच्या नुकसानीसाठी २ कोटी ६३ लाख ९ हजार रुपये निधी येणे आहे. त्याचबरोबर विविध शासकीय विभागांना पूरबाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळालेला नाही.

यात महावितरणसाठी ३६ कोटी १८ लाख ३४ हजार रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुलांसाठी १२ कोटी ५० लाख, आरोग्य विभागासाठी पाच कोटी ७१ लाख ५ हजार, पाटबंधारे विभागासाठी २ कोटी २२ लाख, महानगरपालिकेसाठी ८ कोटी ७ लाख, नगरपालिका ४ कोटी २३ लाख ४२ हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ५ कोटी ४८ लाख ९३ हजार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या मालमत्तेसाठी १७ कोटी ३८ लाख, जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी मालमत्तेसाठी १९ कोटी ७ लाख ४१ हजार रुपये निधीचा समावेश आहे.

पूरग्रस्त नुकसानीचा निधी तातडीने देऊजिल्'ात पुरग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या निधी व्यतिरिक्त अद्याप काही निधी प्रलंबित असून, सरकारने तो लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. १७) मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या

वेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पूरग्रस्तांना निधी आला किती? वाटप किती झाला? प्रलंबित किती आहे? याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासाने अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हा निधी लवकरात लवकर दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. 

 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर