शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी इर्षेने ८५ टक्के मतदान

By admin | Updated: July 26, 2015 00:41 IST

अनेक गावांत खडाजंगी, बाचाबाचीचे प्रकार

७७९० उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद ;उद्या गुलाल कोल्हापूर : जिल्ह्यातील ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी तणावाच्या वातावरणात इर्षेने ८५.१८ टक्के, तर ४० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत ८५.६४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसातपासूनच मतदानासाठी केंद्रांवर रांगा लागल्याने सकाळी अकरापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक मतदान झाले. अनेक ठिकाणी बोगस मतासह मतदान करण्यावरून खडाजंगी व बाचाबाचीचे प्रकार घडले. ३९६३ जागांसाठी रिंगणात असलेल्या ७७९० उमेदवारांचे भवितव्य मतदान मशीनमध्ये बंद झाले. मतमोजणी उद्या, सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. साधारणत: दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल लागेल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्'ातील ४१६ ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम लागले होते. त्यापैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. १ हजार ५०७ प्रभागात ३ हजार ९६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. ४७ संवेदनशील गावांत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पक्षापेक्षा स्थानिक सोयीनुसार आघाड्यांमध्ये लढती झाल्या. विधानसभा निवडणुकीत एकत्र असणाऱ्यांनीच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काही ठिकाणी मतदानाची वेळ सुरू होण्यापूर्वी मतदारांनी केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावल्या. यावरून निवडणुकीतील चुरस स्पष्ट होते. दुपारी दीडपर्यंत जिल्'ात सरासरी ६२.१८ टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदानाचा काहीसा वेग मंदावला. दुपारी साडेतीन वाजता सरासरी ७५.६५ टक्केमतदान झाले होते. दुपारी चारनंतर मतदारयाद्या चाळून मतदान न झालेल्यांचा शोध सुरू झाला. शेवटपर्यंत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये ईर्षा लागली होती. सर्वच ठिकाणी काटा लढत असल्याने मतदारांना खूश करण्याची एकही संधी उमेदवारांनी सोडली नाही. अनेक गावांत ‘अंगठी’ चिन्ह असलेल्या उमेदवारांनी थेट सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले. पैसा, दारू, मटणाचा तर अक्षरश: महापूरच आला होता. अनेक ठिकाणी पाच किलो साखर, गुळाचे रवे देऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांना प्रलोभने दिली जात असताना जिल्हा प्रशासनाचा कोठेही अंंकुश दिसला नाही. दृष्टिक्षेपात निवडणूक - निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत-४१६ बिनविरोध - ४६ प्रत्यक्ष निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती- ३७० मतदार- ८ लाख ६४ हजार प्रभाग- १५०७ जागा- ३९६३ उमेदवार- ७७९०