शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने व ईर्ष्येने सरासरी ८४.५१ टक्के मतदान झाले. अचानक दुपारनंतर पडणाºया पावसाच्या धास्तीने तसेच शेतीकामासाठी वेळ मिळावा, यासाठी सकाळी सातपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोतोली, वडणगे, कोलोली, बोरवडे येथे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. मतमोजणी आज, मंगळवारी होत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने व ईर्ष्येने सरासरी ८४.५१ टक्के मतदान झाले. अचानक दुपारनंतर पडणाºया पावसाच्या धास्तीने तसेच शेतीकामासाठी वेळ मिळावा, यासाठी सकाळी सातपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोतोली, वडणगे, कोलोली, बोरवडे येथे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. मतमोजणी आज, मंगळवारी होत आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढला. या निवडणुकीत गावागावांत कमालीची ईर्षा व चुरस दिसून आली. एकेका मतासाठी उमेदवार व समर्थकांकडून चढाओढ सुरू होती. वृद्ध महिला व आजारी रुग्णांना थेट उचलूनच कार्यकर्ते मतदान केंद्रांवर जात होते. संवेदनशील केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तासह राखीव बटालीयनच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या होत्या.वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती हायस्कूलच्या केंद्रावर सकाळी साडेनऊपर्यंत १७ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी मतदारसंख्या जास्त असल्याने व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्राबाहेर उमेदवार व समर्थकांची गर्दी दिसत होती. सकाळच्या टप्प्यात प्रयाग चिखली येथील केंद्र शाळेत सरासरी १६ टक्के मतदान झाले. पिंपळे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील विद्यामंदिरातील केंद्रावर सरासरी ३० टक्के मतदान झाले. संवेदनशील असलेल्या कोलोली येथे सकाळी ११.३० पर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले. या ठिकाणी सकाळी सातपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोतोलीतील नेहरू विद्यामंदिर येथे सरासरी ५० टक्के मतदान झाले. करंजफेण येथे दुपारच्या टप्प्यातच ८५ टक्के मतदान झाल्याने दुपारी मतदान केंद्र ओस पडले होते. बांबवडे येथे दुपारी दोनपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होेते. येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या केंद्राबाहेर एकेका मतासाठी धावपळ सुरू होती. सरूड येथील महात्मा गांधी विद्यालय या केंद्राबाहेर दुपारी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर कार्यकर्त्यांच्या गराड्यात थांबून चर्चा करीत होते. कापशी येथील विद्यामंदिरच्या केंद्रावर दुपारी उन्हातही मतदानासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.बोरवडे, वडणगेत वादावादीपन्हाळा तालुक्यातील कोलोली आणि कोतोली, कागल तालुक्यातील बोरवडे व करवीर तालुक्यातील वडणगे येथे किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केंद्रांबाहेर उमेदवार व समर्थकांची गर्दी दिसत होती. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे सकाळी मतदान केंद्राच्या आवारात थांबलेल्या उमेदवार व समर्थकांना पोलिसांनी बाहेर काढताना वादावादीचा प्रकार घडला.