शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पंचगंगेत रोज ८० एमएलडी सांडपाणी-- नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:07 IST

कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र,

ठळक मुद्देदूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका;: सांडपाणी वाहिनी फुटल्याचा फटका. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी

भारत चव्हाण ।कोल्हापूर : एकेकाळी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देणाºया महानगरपालिका प्रशासनाला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करता न आल्याने थेट पंचगंगा नदीत सांडपाणी सोडून दिले जात होते. मात्र, चार वर्षांपूर्वी राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून अद्ययावत असे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अशक्य झालेले आहे. परिणामी, दररोज ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. नदीच्या खालच्या भागात येणाºया गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा हा गंभीर प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे सध्या तरी काहीच होताना दिसत नाही.

अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, गंभीर प्रश्नाकडेसुद्धा कानाडोळा करण्याची वृत्ती, अत्यावश्यक सेवेच्या कामाची निविदा काढण्यात झालेली चालढकल, अशा गोंधळजनक कामामुळे आज घडीला शहरातील सर्व प्रकारचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट पंचगंगा नदीत सोडून दिले जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन साथीचे, तसेच जलजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढलेला आहे. अधिकाºयांच्या अशाच मानसिकतेतून काम सुरू राहिले, तर पुढील दोन महिने तरी सांडपाणी रोखण्यात प्रशासनाला यश येईल, याची सुतराम शक्यता नाही.

१३ सप्टेंबरला रात्री बारा वाजता शहरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहरात सखल भागात, तसेच ओढ्यांच्या काठावर राहणाºया नागरिकांच्या शेकडो घरात पाणी शिरले. त्याच रात्री जयंती नाला पंपिंग हाऊसजवळील सांडपाणी वाहून नेणारी एक पाईपलाईन लोखंडी पुलासह नाल्यात कोसळली. जयंती नाल्यातील दिवसभरातील सुमारे ६० एमएलडी सांडपाणी दसरा चौक येथील पंपिंग हाऊसमधून उचलून ते या पाईपलाईनद्वारे कसबा बावडा येथील अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेण्यात येत होते; पण ही पाईपलाईनच कोसळली असल्याने सांडपाणी वाहून नेण्याचे काम बंद पडले आहे. परिणामी, नाल्यातून येणारे सर्व सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय पुढे पंचगंगा नदीत मिसळत आहे.दुधाळी नाल्यावर १८ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय बापट कॅम्प व कदमवाडी येथील नाल्यावर बंधारे बांधून त्यातील १० एमएलडी सांडपाणी कसबा बावडा प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे कामसुद्धा अपूर्ण आहे.यंत्रणा सक्षम, हाताळणी सदोषजयंती नाल्यातील सांडपाणी उपसा करण्याकरिता ४५० अश्वशक्तीचे चार पंप आहेत. नुकतीच या उपसा केंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे; परंतु पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून ही यंत्रणाही बंद आहे. ७६ कोटींचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही अद्ययावत आहे; पण सांडपाणी मिळणे बंद झाल्यामुळे हे केंद्रही बंद ठेवावे लागले आहे. महानगरपालिकेची यंत्रणा सक्षम असूनही हाताळणी नीट नसल्याने नदीचे प्रदूषण वाढणार आहेमनपा प्रशासनाची क्षमता७५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे अद्ययावत प्रक्रिया केंद्र.केंद्रात १२.५० एम.एल.डी.चे सहा अद्ययावत बेडप्रक्रिया केंद्रात संगणकीय स्काडा पध्दतीचा वापरप्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाºया पाण्याचा वापर शेती, बांधकाम, उद्यानासाठीप्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणारा गाळ शेतकºयांना मोफतप्रक्रिया केंद्र अद्ययावत असल्याने साथीच्या आजारांचा धोका कमीप्रक्रिया के ंद्र सुरु राहिल्यास नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदतसध्याची परिस्थितीजयंती नाला ६० एमएलडी सांडपाणीदुधाळी नाला १८ते २० एमएलडी सांडपाणीबापट कॅॅम्प, कदमवाडी नाला १० ते १२ एमएलडी सांडपाणीसांडपाणी प्रक्रियेशिवाय नदीत सोडले जात आहेसव्वा महिना झालातरी सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्णपणे बंद 

सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे. जयंती नाला येथून सांडपाणी उपसा बंद ठेवला आहे. नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात व्हावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा डोस वाढविण्यात आला आहे. याबाबत आम्ही प्रयत्न करीत असून, लवकरात लवकर हा प्रश्न सोडविला जाईल. - सुरेश कुलकर्णी, जल अभियंता.