शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कोल्हापुरी गुळाचा ‘गोडवा’ वाढणार आवकेत ७१ हजार रव्यांची वाढ; दरही तेजीत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:03 IST

उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे.

ठळक मुद्देआगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईलगेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता आगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘कोल्हापुरी गूळ’ हा कोल्हापूरच्या ओळखीतील प्रमुख आहे. चव व कणीदार गुळाने साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. येथील जमिनीतच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव येते. जिल्'ात दीड हजार गुºहाळघरे होती, पण अनिश्चित दर, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि उसाच्या वाढत गेलेल्या दरामुळे शेतकरी गूळ निर्मितीपासून थोडे दूर जाऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ८६ हजार ७२ रव्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर राहिला होता. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच ३ लाख ५७ हजार रव्यांची आवक झाली.

यामध्ये पावसाळ्यात कर्नाटकातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात घटस्थापनेच्या अगोदरपासून गुºहाळे सुरू आहेत; त्यामुळे आवकेत वाढ झाली आहे. यंदा आवक वाढली असली, तरी दरही चांगला मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर आहे. यंदा साखरेचा किमान दर २९ रुपये केला, उसाचे उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम गूळ दरावर होणार आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता, यंदा दोनशे रुपये जादा दर मिळण्याची शक्यता आहे.‘अवकाळी’चा अडथळा कमीगतवर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरपासून परतीचा व अवकाळी पाऊस यंदा कमी आहे. दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस झालाच नसल्याने गुºहाळ घरांना अडथळा आला नाही. याचा परिणामही आवक वाढण्यात झाला आहे.

तरच ऊस गुºहाळघराकडेसाधारणत: कोल्हापुरातील उसाचे वाण पाहता दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २६० किलो गूळ तयार होतो. आताचा सरासरी ३६०० रुपये दर कायम राहिला तर या गुळाचे ९३६० रुपये होतात. त्यातून गुळाचा उत्पादन खर्च २५०० रुपये वजा जाता ६८६० रुपये (दोन टन ऊस गाळप करून) शिल्लक राहतात. यंदा कारखान्यांची सरासरी २९०० रुपये एफआरपी आहे; त्यामुळे गुळाचा दर ३६०० रुपये कायम राहिला तरच शेतकरी गुºहाळघराकडे वळणार आहे. 

यंदा उसाचे उत्पादन कमी आणि कारखान्यांच्या वाढलेल्या एफआरपीमुळे गुळाचा दर चांगला राहील. गुळाची आवक कमी झाली, तरी सरासरी दरात वाढ राहू शकते. - मोहन सालपे(सचिव, बाजार समिती)कोल्हापुरी गुळाला नेहमीच मागणी चांगली राहते. साखरेच्या दराचा परिणाम गूळ दरावर होतो, त्यामुळे यंदा मार्केट चांगले राहील असे वाटते.- बाळासाहेब मनाडे (गूळ व्यापारी)

टॅग्स :Baazaarबाजारbusinessव्यवसाय