शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कोल्हापुरी गुळाचा ‘गोडवा’ वाढणार आवकेत ७१ हजार रव्यांची वाढ; दरही तेजीत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:03 IST

उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे.

ठळक मुद्देआगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईलगेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता आगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘कोल्हापुरी गूळ’ हा कोल्हापूरच्या ओळखीतील प्रमुख आहे. चव व कणीदार गुळाने साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. येथील जमिनीतच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव येते. जिल्'ात दीड हजार गुºहाळघरे होती, पण अनिश्चित दर, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि उसाच्या वाढत गेलेल्या दरामुळे शेतकरी गूळ निर्मितीपासून थोडे दूर जाऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ८६ हजार ७२ रव्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर राहिला होता. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच ३ लाख ५७ हजार रव्यांची आवक झाली.

यामध्ये पावसाळ्यात कर्नाटकातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात घटस्थापनेच्या अगोदरपासून गुºहाळे सुरू आहेत; त्यामुळे आवकेत वाढ झाली आहे. यंदा आवक वाढली असली, तरी दरही चांगला मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर आहे. यंदा साखरेचा किमान दर २९ रुपये केला, उसाचे उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम गूळ दरावर होणार आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता, यंदा दोनशे रुपये जादा दर मिळण्याची शक्यता आहे.‘अवकाळी’चा अडथळा कमीगतवर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरपासून परतीचा व अवकाळी पाऊस यंदा कमी आहे. दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस झालाच नसल्याने गुºहाळ घरांना अडथळा आला नाही. याचा परिणामही आवक वाढण्यात झाला आहे.

तरच ऊस गुºहाळघराकडेसाधारणत: कोल्हापुरातील उसाचे वाण पाहता दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २६० किलो गूळ तयार होतो. आताचा सरासरी ३६०० रुपये दर कायम राहिला तर या गुळाचे ९३६० रुपये होतात. त्यातून गुळाचा उत्पादन खर्च २५०० रुपये वजा जाता ६८६० रुपये (दोन टन ऊस गाळप करून) शिल्लक राहतात. यंदा कारखान्यांची सरासरी २९०० रुपये एफआरपी आहे; त्यामुळे गुळाचा दर ३६०० रुपये कायम राहिला तरच शेतकरी गुºहाळघराकडे वळणार आहे. 

यंदा उसाचे उत्पादन कमी आणि कारखान्यांच्या वाढलेल्या एफआरपीमुळे गुळाचा दर चांगला राहील. गुळाची आवक कमी झाली, तरी सरासरी दरात वाढ राहू शकते. - मोहन सालपे(सचिव, बाजार समिती)कोल्हापुरी गुळाला नेहमीच मागणी चांगली राहते. साखरेच्या दराचा परिणाम गूळ दरावर होतो, त्यामुळे यंदा मार्केट चांगले राहील असे वाटते.- बाळासाहेब मनाडे (गूळ व्यापारी)

टॅग्स :Baazaarबाजारbusinessव्यवसाय