शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी गुळाचा ‘गोडवा’ वाढणार आवकेत ७१ हजार रव्यांची वाढ; दरही तेजीत राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:03 IST

उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे.

ठळक मुद्देआगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईलगेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता आगामी दोन-तीन महिन्यांत यामध्ये किमान दोनशे रुपयांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘कोल्हापुरी गूळ’ हा कोल्हापूरच्या ओळखीतील प्रमुख आहे. चव व कणीदार गुळाने साऱ्या जगाला भुरळ घातली आहे. येथील जमिनीतच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव येते. जिल्'ात दीड हजार गुºहाळघरे होती, पण अनिश्चित दर, साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि उसाच्या वाढत गेलेल्या दरामुळे शेतकरी गूळ निर्मितीपासून थोडे दूर जाऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत २२ लाख गूळ रव्यांची आवक झाली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २ लाख ८६ हजार ७२ रव्यांची आवक झाली होती. त्यावेळी सरासरी प्रतिक्विंटल ३६०० रुपये दर राहिला होता. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच ३ लाख ५७ हजार रव्यांची आवक झाली.

यामध्ये पावसाळ्यात कर्नाटकातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यात घटस्थापनेच्या अगोदरपासून गुºहाळे सुरू आहेत; त्यामुळे आवकेत वाढ झाली आहे. यंदा आवक वाढली असली, तरी दरही चांगला मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर आहे. यंदा साखरेचा किमान दर २९ रुपये केला, उसाचे उत्पादन कमी असल्याने त्याचा परिणाम गूळ दरावर होणार आहे. गुजरात बाजारपेठेचा अंदाज घेता, यंदा दोनशे रुपये जादा दर मिळण्याची शक्यता आहे.‘अवकाळी’चा अडथळा कमीगतवर्षीच्या तुलनेत आॅक्टोबरपासून परतीचा व अवकाळी पाऊस यंदा कमी आहे. दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस झालाच नसल्याने गुºहाळ घरांना अडथळा आला नाही. याचा परिणामही आवक वाढण्यात झाला आहे.

तरच ऊस गुºहाळघराकडेसाधारणत: कोल्हापुरातील उसाचे वाण पाहता दोन टन उसाचे गाळप केल्यानंतर २६० किलो गूळ तयार होतो. आताचा सरासरी ३६०० रुपये दर कायम राहिला तर या गुळाचे ९३६० रुपये होतात. त्यातून गुळाचा उत्पादन खर्च २५०० रुपये वजा जाता ६८६० रुपये (दोन टन ऊस गाळप करून) शिल्लक राहतात. यंदा कारखान्यांची सरासरी २९०० रुपये एफआरपी आहे; त्यामुळे गुळाचा दर ३६०० रुपये कायम राहिला तरच शेतकरी गुºहाळघराकडे वळणार आहे. 

यंदा उसाचे उत्पादन कमी आणि कारखान्यांच्या वाढलेल्या एफआरपीमुळे गुळाचा दर चांगला राहील. गुळाची आवक कमी झाली, तरी सरासरी दरात वाढ राहू शकते. - मोहन सालपे(सचिव, बाजार समिती)कोल्हापुरी गुळाला नेहमीच मागणी चांगली राहते. साखरेच्या दराचा परिणाम गूळ दरावर होतो, त्यामुळे यंदा मार्केट चांगले राहील असे वाटते.- बाळासाहेब मनाडे (गूळ व्यापारी)

टॅग्स :Baazaarबाजारbusinessव्यवसाय