शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

७० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित-- हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकºयांना लाभच होणार नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या अन्यायाविरोधात आम्ही आज, शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय बंद पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील ७० टक्के शेतकºयांना लाभच होणार नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या अन्यायाविरोधात आम्ही आज, शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार आहोत. त्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्र्यांचीही लवकरच भेट घेणार आहोत. सरकारने यात लक्ष घालून अन्याय दूर न केल्यास दसºयानंतर जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत बंद पाडण्याचा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.

कर्जमाफीचा लाभ देण्यापेक्षा तो कसा मिळणार नाही, अशीच व्यवस्था सरकारने विविध अटी घालून केली आहे. सेवा संस्थेच्या सचिवांची आम्ही बुधवारीच (दि. २०) बैठक घेतली. त्यांच्याकडूनही शेतकºयांना या योजनेचा लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया आली. हंगामनिहाय कर्जवाटप, खावटी कर्जाचा व अपात्र कर्जमाफीचा समावेश नसल्याने बहुतांश शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ होणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.४०० कोटींना फटकाबँकेने १ जुलै २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत १ लाख ७५ हजार शेतकºयांना सुमारे ३५० कोटींचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. खावटी कर्जाचे १९१ कोटी वाटप झाले आहे आणि अपात्र कर्जमाफीतील ९२ कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठन केले आहे. याचा अर्थ वाटप झालेले एकूण कर्ज ६३३ कोटींचे आहे. त्यातील ७० टक्के रक्कम मिळणार नाही, असे विचारात घेतले तरी हा शेतकºयांना किमान ४०० कोटींचा फटका बसू शकतो, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.चावडीवाचन म्हणजे अबू्र काढण्याचेच कामकर्जमाफीची सर्व माहिती शेतकरी आॅनलाईन भरून देत आहेत. त्याचा मोबाईल क्रमांकही तुमच्याकडे आहे. बँकेकडेही त्याचे तपशील आहेत. असे असताना पुन्हा कर्जमाफी कुणाला मिळाली याचे चावडीवाचन करणे म्हणजे शेतकºयाची अब्रू काढण्यातला प्रकार असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली. या चावडीवाचनाचा हेतूच कळत नसल्याचे त्यांनी सांगितले.मुदतवाढ द्याया योजनेसाठी पात्र असणाºया १८६१ संस्थांपैकी केवळ ४८० संस्था संगणकीकृत आहेत. उर्वरित संस्थांकडे संगणक सुविधा नसल्याने ही माहिती अन्य यंत्रणेकडून भरून घ्यावी लागत आहे.त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. ही मुदत आज, शुक्रवारपर्यंत होती.