शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कर्जमाफीचा लाभ आणखी ६६ हजार शेतकऱ्यांना

By admin | Updated: July 5, 2017 23:29 IST

कोल्हापूर विभागातील चित्र : तीन जिल्ह्यांसाठी २४० कोटीं मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकऱ्यांकडे २४० कोटी ६३ लाखांची थकबाकी असल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीत घेण्याची मागणी राज्यातून झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारने दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. दीड लाखावरील थकबाकीदारांना उर्वरित रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचबरोबर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के व जास्तीत जास्त २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने २००८ ला केलेल्या कर्जमाफीनंतर २०१२ पर्यंत चार वर्षांतील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना राज्यात व्यक्त होत होती. त्यामुळे २००९ नंतर थकीत असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.

एप्रिल २०१२ ते जून २०१६ अखेर कोल्हापूर विभागातील ९२ हजार ७२ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार होता. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कर्जमाफीची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतल्याने विभागातील ६६ हजार शेतकऱ्यांना २४० कोटी ६३ लाखांचा लाभ मिळणार आहे.