शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कर्जमाफीचा लाभ आणखी ६६ हजार शेतकऱ्यांना

By admin | Updated: July 5, 2017 23:29 IST

कोल्हापूर विभागातील चित्र : तीन जिल्ह्यांसाठी २४० कोटीं मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकऱ्यांकडे २४० कोटी ६३ लाखांची थकबाकी असल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीत घेण्याची मागणी राज्यातून झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारने दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. दीड लाखावरील थकबाकीदारांना उर्वरित रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याचबरोबर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के व जास्तीत जास्त २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती; पण एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने २००८ ला केलेल्या कर्जमाफीनंतर २०१२ पर्यंत चार वर्षांतील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना राज्यात व्यक्त होत होती. त्यामुळे २००९ नंतर थकीत असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती.

एप्रिल २०१२ ते जून २०१६ अखेर कोल्हापूर विभागातील ९२ हजार ७२ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार होता. एप्रिल २०१२ पूर्वी ६६ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. त्यामुळे राज्य सरकारने बुधवारी कर्जमाफीची व्याप्ती वाढण्याचा निर्णय घेतल्याने विभागातील ६६ हजार शेतकऱ्यांना २४० कोटी ६३ लाखांचा लाभ मिळणार आहे.