शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनता बझारमध्ये ६५ लाखांचा अपहार

By admin | Updated: February 20, 2017 00:51 IST

अध्यक्ष, व्यवस्थापकासह नऊजणांवर गुन्हा; प्रल्हाद चव्हाण, प्रकाश बोंद्रे यांचा समावेश

कोल्हापूर : जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या खर्चाची खोटी कागदपत्रे तयार करून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापकासह नऊजणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व प्रकाश बोंद्रे यांच्यासह आठ संचालकांचा समावेश आहे. या अपहार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संस्थेचे अध्यक्ष उदय ऊर्फ उद्धव रा. पोवार (रा. शुक्रवार पेठ), संचालक प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (रा. शिवाजी पेठ), प्रकाश परशराम बोंद्रे (शिवाजी पेठ), तानाजी धोंडिराम साजणीकर (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), अरुण यशवंत साळोखे (रा. आपटेनगर), शिवाजी बा. घाटगे (रा. शिवाजी पेठ), नीरज कैलास जाजू (रा. नागाळा पार्क), कात्यायनी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक आनंदराव बा. फडतरे (रा. भुये, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. संचालक शामराव महादेव शिंदे (रा. शुक्रवार पेठ) यांचेही नाव गुन्ह्णात आहे; परंतु निधन झाल्याने त्यांना या गुन्ह्णातून वगळले आहे. पोलिसांनी सांगितले, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ चे विष्णू गणपती कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ येथील देशभक्त रत्नापाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स या संस्थेचे लेखापरीक्षण दि. १७ जून २०१५ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत पूर्ण केले. यावेळी संस्थेच्या जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ या शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचे दाखवून लक्ष्मीपुरीतील मुख्य शाखेच्या किर्दीमध्ये रकमा खर्ची टाकून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपहाराची लेखी माहिती त्यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिली. त्यांनी या प्रकरणी १७ फेब्रुवारीला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कदम यांना दिले. त्यानुसार रविवारी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. असा झाला उलगडा संस्थेने अथर्व मार्केटिंगचे नीरज जाजू व नितीन जाजू यांना जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखा २० वर्षे मुदतीच्या कराराने चालविण्यास दिल्या आहेत. संस्थेने ८ फेब्रुवारी २०१४ पासून जाजू यांना संचालक म्हणून घेतले. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अथर्व मार्केटिंग यांच्याशी नवीन करार केला. त्यामध्ये संस्थेच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाचा खर्च अथर्व मार्केटिंगने करावयाचा असल्याचा ठराव आहे. यासंबंधी लेखापरीक्षक कदम यांनी अथर्व मार्केटिंगच्या नीरज व नितीन जाजू यांना खर्चासंबंधी विचारणा केली असता त्यांनी कंपनीतर्फे जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचा अहवाल दिला; तर संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी संस्थेने खर्च केल्याचा अहवाल दिला. दोन्ही अहवाल विसंगत आल्याने अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी १० मे २०१२ रोजी सभेतील ठरावानुसार समिती स्थापन करून व पाच सभा घेतल्याचे भासवून बांधकाम समिती, कात्यायनी मजूर सहकारी संस्था व रेवणसिद्ध मजूर सहकारी संस्थेशी संगनमत करून अपहार केला आहे. बंद संस्थेत ‘अर्थ’ जनता बझार बंद पडून पंधरा वर्षांपासून अधिक काळ झाला. या संस्थेवर हे संचालक केवळ नामधारी होते. तरीही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला.