शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

जनता बझारमध्ये ६५ लाखांचा अपहार

By admin | Updated: February 20, 2017 00:51 IST

अध्यक्ष, व्यवस्थापकासह नऊजणांवर गुन्हा; प्रल्हाद चव्हाण, प्रकाश बोंद्रे यांचा समावेश

कोल्हापूर : जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या खर्चाची खोटी कागदपत्रे तयार करून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापकासह नऊजणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व प्रकाश बोंद्रे यांच्यासह आठ संचालकांचा समावेश आहे. या अपहार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संस्थेचे अध्यक्ष उदय ऊर्फ उद्धव रा. पोवार (रा. शुक्रवार पेठ), संचालक प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (रा. शिवाजी पेठ), प्रकाश परशराम बोंद्रे (शिवाजी पेठ), तानाजी धोंडिराम साजणीकर (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), अरुण यशवंत साळोखे (रा. आपटेनगर), शिवाजी बा. घाटगे (रा. शिवाजी पेठ), नीरज कैलास जाजू (रा. नागाळा पार्क), कात्यायनी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक आनंदराव बा. फडतरे (रा. भुये, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. संचालक शामराव महादेव शिंदे (रा. शुक्रवार पेठ) यांचेही नाव गुन्ह्णात आहे; परंतु निधन झाल्याने त्यांना या गुन्ह्णातून वगळले आहे. पोलिसांनी सांगितले, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ चे विष्णू गणपती कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ येथील देशभक्त रत्नापाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स या संस्थेचे लेखापरीक्षण दि. १७ जून २०१५ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत पूर्ण केले. यावेळी संस्थेच्या जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ या शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचे दाखवून लक्ष्मीपुरीतील मुख्य शाखेच्या किर्दीमध्ये रकमा खर्ची टाकून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपहाराची लेखी माहिती त्यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिली. त्यांनी या प्रकरणी १७ फेब्रुवारीला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कदम यांना दिले. त्यानुसार रविवारी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. असा झाला उलगडा संस्थेने अथर्व मार्केटिंगचे नीरज जाजू व नितीन जाजू यांना जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखा २० वर्षे मुदतीच्या कराराने चालविण्यास दिल्या आहेत. संस्थेने ८ फेब्रुवारी २०१४ पासून जाजू यांना संचालक म्हणून घेतले. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अथर्व मार्केटिंग यांच्याशी नवीन करार केला. त्यामध्ये संस्थेच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाचा खर्च अथर्व मार्केटिंगने करावयाचा असल्याचा ठराव आहे. यासंबंधी लेखापरीक्षक कदम यांनी अथर्व मार्केटिंगच्या नीरज व नितीन जाजू यांना खर्चासंबंधी विचारणा केली असता त्यांनी कंपनीतर्फे जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचा अहवाल दिला; तर संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी संस्थेने खर्च केल्याचा अहवाल दिला. दोन्ही अहवाल विसंगत आल्याने अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी १० मे २०१२ रोजी सभेतील ठरावानुसार समिती स्थापन करून व पाच सभा घेतल्याचे भासवून बांधकाम समिती, कात्यायनी मजूर सहकारी संस्था व रेवणसिद्ध मजूर सहकारी संस्थेशी संगनमत करून अपहार केला आहे. बंद संस्थेत ‘अर्थ’ जनता बझार बंद पडून पंधरा वर्षांपासून अधिक काळ झाला. या संस्थेवर हे संचालक केवळ नामधारी होते. तरीही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला.