शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा झटका, तळ ठोकलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील ६३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

By राजाराम लोंढे | Updated: July 15, 2025 19:31 IST

तीनपेक्षा अधिक वर्षे एकाच शाखेत काम केलेले चर्चेत

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) अनेक शाखांमध्ये तीनपेक्षा अधिक वर्षे तळ ठोकून बसलेल्या सुमारे ६३० कर्मचाऱ्यांवर नाबार्डने हरकत घेतली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, संबंधितांना तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यात एक शाखा सुचवण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले आहेत.कर्मचाऱ्यांना सर्व विभागांतील कामाचा अनुभव यावा, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी होतात. एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम केले तर मानसिकदृष्ट्या ते योग्यही नसते. मग, त्याठिकाणी हितसंबंध तयार होऊन त्याचा कामावर परिणामही होतो. त्यामुळे तीन वर्षांनी नवीन ठिकाणी बदली केली तर त्या कर्मचाऱ्याच्या कामाचा अनुभवही प्रत्येक तालुक्याला मिळतो. शासनाप्रमाणेच सहकारी बॅंकांमध्ये तीन वर्षांनी बदलीची प्रकिया राबविली जाते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मात्र चार, पाच, दहा वर्षे एकाच ठिकाणी अनेक कर्मचारी तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या बदल्या करण्याबाबत नाबार्डच्या प्रत्येक तपासणीत मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बदल्यांचा विषय काढला, पण तोंडावर विधानसभा निवडणुका असल्याने तो पुन्हा बारगळला. यावर्षीच्या नाबार्ड तपासणीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बँकेने बदल्यांचा निर्णय घेतला आहे.

म्हणजे अपहाराला बळबँकेत आतापर्यंत जे अपहार झालेत, ते कर्मचारी तीनपेक्षा अधिक वर्षे त्या शाखेत तळ ठोकून होते. अनेक वर्षे तिथेच काम केल्याने अनेकांशी हितसंबंध येतात व त्यातून चुकीचे काम करण्यास बळ मिळते.

शनिवारपर्यंत पसंतीच्या शाखा सुचवाव्या लागणारसंबंधित कर्मचाऱ्यांना शनिवार (दि. १९) पर्यंत तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यातील एक अशा तीन शाखा सुचवण्यास सांगितले आहे. तालुक्यात जागा शिल्लक नसेल तर दुसऱ्या शाखेत जावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांना शाखा सुचवण्यास सांगितले आहे. त्यानंतर बदल्या करणार आहोत. - जी. एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)