शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
2
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
3
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
4
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
5
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
6
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
7
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
8
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
9
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
10
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
11
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
12
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
13
सीएसएमटी परिसरातून अखेर दोन दिवसांनी धावली वाहने
14
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
15
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
16
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
17
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
18
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
19
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
20
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!

नाबार्डचा झटका, तळ ठोकलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतील ६३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

By राजाराम लोंढे | Updated: July 15, 2025 19:31 IST

तीनपेक्षा अधिक वर्षे एकाच शाखेत काम केलेले चर्चेत

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) अनेक शाखांमध्ये तीनपेक्षा अधिक वर्षे तळ ठोकून बसलेल्या सुमारे ६३० कर्मचाऱ्यांवर नाबार्डने हरकत घेतली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, संबंधितांना तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यात एक शाखा सुचवण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले आहेत.कर्मचाऱ्यांना सर्व विभागांतील कामाचा अनुभव यावा, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी होतात. एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम केले तर मानसिकदृष्ट्या ते योग्यही नसते. मग, त्याठिकाणी हितसंबंध तयार होऊन त्याचा कामावर परिणामही होतो. त्यामुळे तीन वर्षांनी नवीन ठिकाणी बदली केली तर त्या कर्मचाऱ्याच्या कामाचा अनुभवही प्रत्येक तालुक्याला मिळतो. शासनाप्रमाणेच सहकारी बॅंकांमध्ये तीन वर्षांनी बदलीची प्रकिया राबविली जाते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मात्र चार, पाच, दहा वर्षे एकाच ठिकाणी अनेक कर्मचारी तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या बदल्या करण्याबाबत नाबार्डच्या प्रत्येक तपासणीत मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बदल्यांचा विषय काढला, पण तोंडावर विधानसभा निवडणुका असल्याने तो पुन्हा बारगळला. यावर्षीच्या नाबार्ड तपासणीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बँकेने बदल्यांचा निर्णय घेतला आहे.

म्हणजे अपहाराला बळबँकेत आतापर्यंत जे अपहार झालेत, ते कर्मचारी तीनपेक्षा अधिक वर्षे त्या शाखेत तळ ठोकून होते. अनेक वर्षे तिथेच काम केल्याने अनेकांशी हितसंबंध येतात व त्यातून चुकीचे काम करण्यास बळ मिळते.

शनिवारपर्यंत पसंतीच्या शाखा सुचवाव्या लागणारसंबंधित कर्मचाऱ्यांना शनिवार (दि. १९) पर्यंत तालुक्यातील दोन व शेजारील तालुक्यातील एक अशा तीन शाखा सुचवण्यास सांगितले आहे. तालुक्यात जागा शिल्लक नसेल तर दुसऱ्या शाखेत जावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांना शाखा सुचवण्यास सांगितले आहे. त्यानंतर बदल्या करणार आहोत. - जी. एम. शिंदे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)