शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

जिल्ह्यात चार दिवसांत ६१ मिलिमीटर वळीव

By admin | Updated: May 18, 2016 00:28 IST

ऐन उन्हाळ्यात दिलासा : पिकांना जीवदान, वादळी वाऱ्यामुळे नुकसान

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ठिकठिकाणी ६१.२ मिलिमीटर वळीव पाऊस पडला. यामुळे टंचाईग्रस्त गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यातील वळवामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. टंचाईग्रस्त गावांत तसेच उष्णतेने हैराण झालेल्यांना काहीकाळ गारवा अनुभवता आला. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. तलाव, विहिरी, आदी जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. दोन महिन्यांपासून पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत आहे. विहिरी, तलावांनी तळ गाठला आहे. यावर आधारित पिके करपली आहेत. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी शेतीच्या पाणीवापरावर निर्बंध आणले आहेत. नदीवरील पाण्यावर उपसाबंदी केली आहे. यामुळे ऊस उत्पादक, उन्हाळी पीक उत्पादक शेतकऱ्यांना वळवाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. काही तालुक्यांत चार-पाच दिवसांत वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सुकणारी पिके पुन्हा तरारली आहेत. कागल तालुक्यातील कापशी परिसरात १३ मे रोजी १२ मि.मी., बांबवडे (ता. शाहूवाडी) भागात ३ मि.मी. वळीव झाला. १४ रोजी चंदगड तालुक्यातील कोवाड ४०, माणगाव ४, आजरा ४, मलिग्रे १४, शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर २, सरुड ३, भेडसगाव १, बांबवडे ३ इतका मि.मी. पाऊस झाला. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी ३४, महागाव २६, नूल २०, हलकर्णी ४०, तर जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे २ मिलिमीटर इतका पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी, वडगाव येथे एक मिलिमीटर आणि हुपरी ४ मि. मी., कबनूर, रुई येथे प्रत्येकी २ मि. मी. पावसाची नोंद झाली. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ५, कोडोली ४ मिलिमीटर पाऊस झाला.करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे दि. १५ रोजी ५, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) ३, शाहूवाडी तालुक्यातील सरुड २, भेडसगाव १, बांबवडे येथे ३ मिलिमीटर पाऊस झाला. १६ रोजी खडकेवाडा (ता. कागल) ३, भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे ७, पिंपळगाव व गारगोटी येथे १, गडहिंग्लज तालुक्यातील नूल २५, दुंडगे ५, कडगाव ३, महागाव १५, नेसरी ८, तर हलकर्णी येथे १ मिलिमीटर इतका पाऊस झाला. गडहिंग्लज तालुक्यावर पावसाची कृपाचार दिवसांत सर्वाधिक वळीव गडहिंग्लज तालुक्यात पडला आहे. त्या तालुक्यातील पाणीटंचाईने तीव्र असलेल्या येणेचवंडी, बसर्गे, हलकर्णी भागांत प्रचंड जोरदार पाऊस कोसळला. यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला. २४ लाखांचे नुकसानसोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट यांच्यासह पाऊस पडल्याने अनेक घरांची पडझड झाली. झाडे उन्मळून पडली. कागल तालुक्यातील घरांच्या पडझडीत एकूण २३ लाख ९९ हजार २६०, तर गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक व खुर्दमध्ये जनावरांचा गोठे, घरे यांचे ६३ हजारांचे नुकसान झाले आहे.