शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रायगडसाठी ६०६ कोटींचा आराखडा मंजूर -संभाजीराजे यांची माहिती : शिवकालीन ढाचा कायम ठेवून संवर्धन; पंधरा दिवसांत काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:03 IST

कोल्हापूर : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणांतर्गत केंद्र सरकारकडून ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे त्यातील ८० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी

कोल्हापूर : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणांतर्गत केंद्र सरकारकडून ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे त्यातील ८० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली. दुर्गराज रायगड किल्ल्याचा शिवकालीन ढाचा कायम ठेवून मंजूूर निधीतून संवर्धन केले जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या रायगड किल्ल्याबाबतची माहिती अथवा जुने दस्ताऐवज ज्या इतिहासप्रेमींकडे असतील त्यांनी ते प्राधिकरणाकडे द्यावेत. त्याचा आधार घेऊन किल्ला विश्ववंदनीय केला जाईल, असेही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागासह इतर विभागांच्या परवानग्यांच्या तांत्रिक बाबी येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार संभाजीराजे म्हणाले, राज्यातील ३५० किल्ल्यांमधील रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असल्याने या किल्ल्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगड संवर्धन आराखड्यात या किल्ल्यासह परिसरातील २२ गावांचा विकास केला जाणार आहे. चित्र दरवाजा ते महादरवाजा, महादरवाजा ते होळीच्या मैदानापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. इतिहास तज्ज्ञांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला बनवायचा आहे, हे काम फार मोठे असून ते पूर्ण होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागणार असल्याची अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

संवर्धनातील महत्त्वाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तर अतिमहत्त्वाचे काम पुरातत्त्व विभागाकडून केले जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. रायगड किल्ल्यावरील पाण्याच्या १३ टाक्यांपैकी पहिल्या टप्प्यात ४ टाक्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. संवर्धनाच्या कामात राज्यातील शिवभक्तांनी सहभागी होऊन आवश्यक त्या सूचना मांडाव्यात,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकालीन ऐतिहासिक वस्तू व पुरावे शोधण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने किल्ल्यामध्ये उत्खनन करणे आवश्यक आहे; पण उत्खननापूर्वीच काही लोकांना ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत, त्यांनी शिवकालीन वारसा जपण्यासाठी अशा वस्तू प्राधिकरणाकडे म्युझियममध्ये जमा कराव्यात, असे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केले. मंजूर झालेल्या ६०६ कोटी रुपये निधीपैकी ८० कोटी निधी प्रधिकरणाकडे जमा झाला आहे.रायगड प्राधिकरणात पन्हाळगडाचाही समावेशराज्यातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे पाच ते सहा किल्ले या रायगड प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. त्यानंतरच इतर किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.‘राजसदर’चे पावित्र्य अबाधितराजसदराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरत असलेल्या ठिकाणचे पावित्र्य राखण्यासाठी तेथे शिवराज्याभिषेकाशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. याबाबत अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे यांनी रायगडवर ३२ मण सोन्याचे राजसिंहासन बसविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी सोन्याचे संकलन सुरू आहे. हे सिंहासन बसविण्यासाठी रायगड व प्राधिकरण परवानगी देणार काय? या विषयाबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. रायगड किल्ल्यासाठी काहीही करताना पुरातत्त्व विभाग आणि प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.संवर्धन काम प्रारंभासाठी २ परवाने हाती, ६ बाकीदहा दिवसांत परवानगी प्रक्रिया होणार पूर्णप्राधिकरणात किल्ल्यासह परिसरातील २२ गावांचा विकासप्राधिकरणावर जयसिंगराव पवार, भगवान चिलेकोकणचे विभागीय आयुक्त व रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकाºयांचा या रायगड प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्राधिकरणावर तज्ज्ञ संचालक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार, राम यादव, भगवान चिले, राघोजी आंग्रे आदी इतिहास अभ्यासकांचा समावेश आहे.