शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘वारणा’साठी ५८ अर्ज वैध, ३१ अवैध

By admin | Updated: April 23, 2015 00:54 IST

अर्ज अवैध ठरल्याने आता पात्र उमेदारांमधील कोण माघार घेते, कोण रिंगणात राहते याकडे सभासदांचे लक्ष आहे.

पन्हाळा : श्री. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ८९ उमेदवारी अर्जांपैकी ३१ अर्ज छाननीमध्ये अपात्र झाले असून ५८ अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खाडे यांनी सांगितले. अपात्र झालेल्यांपैकी बहुतेक उमेदवार हे शेतकरी संघटनेचे आहेत. साखर कारखान्यास गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस न घालणे, वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर न राहणे, अशी कारणे असल्याने असल्याने हे अर्ज अपात्र झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ऊस उत्पादक व्यक्ती सभासदांचे पाच गट असून, त्यात अपात्र झालेले अर्ज पुढीलप्रमाणे : गट १ - १ अपात्र, गट २ - १० अपात्र, गट ३ - १० अपात्र, गट ४ - ५ अपात्र, इतर मागास गट : ४ अपात्र, भटक्या जाती गट : १ अपात्र, असे ३१ अर्ज अपात्र झाले आहेत. आता ५८ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्ज व गट पुढीलप्रमाणे गट १ - ९ पात्र, गट २ - १० पात्र, गट ३ - ४ पात्र, गट ४ - ६ पात्र, गट ५ - १० पात्र, उत्पादक सहकारी संस्था गट - ५ पात्र, महिला गट - ६ पात्र, इतर मागास गट - ४ पात्र, भटक्या विमुक्त जाती गट - २ पात्र, असे ५८ अर्ज पात्र ठरले आहेत. अर्ज माघारीची मुदत ७ मे पर्यंत आहे. स्वाभिमानीचे काही अर्ज अवैध ठरल्याने आता पात्र उमेदारांमधील कोण माघार घेते, कोण रिंगणात राहते याकडे सभासदांचे लक्ष आहे.