शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार, पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:13 IST

Jalyukt Shivar, kolhapurnews राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

कोल्हापूर : राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोरात राबवले गेले. या कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर ह्यकॅगह्णनेही ताशेरे ओढल्याने अखेर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय विद्यमान महाविकास आघाडीने सरकारने केला आहे. यावरून आजी-माजी सत्ताधाऱ्यांमध्ये वाक‌्युद्ध रंगले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील या अभियानाचा आढावा घेतला असता कागदोपत्री शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसते. कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या या अभियानाने सर्व सरकारी विभागांना सोबत घेत काम पूर्णत्वासह निधीही खर्च केला आहे.

पाच वर्षांत झालेल्या कामामुळे नऊ हजार ७८३ टीसीएम पाण्याची साठवणूक क्षमताही वाढीस लागली आहे. यात मोठे काम होते, ते कळंबा तलावातील गाळ काढणे, जाखले व तमदलगेसह जोतिबा डोंगरावरील तलावांचे पुनरुज्जीवन करणे. यात चांगले यशही आले आहे.तथापि इतर लहानसहान कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडी केल्याने ही कामे केली होती का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गावागावांत झाली होती. लोकसहभागातून कामे करावयाची असताना आणि कुशल-अकुशलचा रेशो सांभाळायचा असतानाही जेसीबीसारख्या यंत्रांनी कामे झाले आहेत. ठेकेदारांना पोसण्याचे काम या योजनेने चांगल्या प्रकारे केले.

  • निवडलेली गावे : १८०
  • पाच वर्षांसाठीचा मंजूर आराखडा : ७१ कोटी ७७ लाख
  • आराखड्यानुसार मंजूर कामे : २३५४
  • पूर्ण झालेली कामे : २३५४
  • खर्च झालेला निधी : ५६ कोटी ५१ लाख ७४ हजार
  • सिंचन क्षमता : ९ हजार ७८३ टीसीएम

ही झाली कामेतलावांतील गाळ काढणे, शेततळे, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, सलग समतल व खोल चर अशी कामे झाली आहेत. 

जिल्ह्यात जलयुक्तचे शंभर टक्के काम झाले असून निधीही खर्च पडला आहे, शासनाने मागवलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा अहवाल पाठवला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर