शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

जिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार, पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:13 IST

Jalyukt Shivar, kolhapurnews राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

कोल्हापूर : राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोरात राबवले गेले. या कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर ह्यकॅगह्णनेही ताशेरे ओढल्याने अखेर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय विद्यमान महाविकास आघाडीने सरकारने केला आहे. यावरून आजी-माजी सत्ताधाऱ्यांमध्ये वाक‌्युद्ध रंगले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील या अभियानाचा आढावा घेतला असता कागदोपत्री शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसते. कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या या अभियानाने सर्व सरकारी विभागांना सोबत घेत काम पूर्णत्वासह निधीही खर्च केला आहे.

पाच वर्षांत झालेल्या कामामुळे नऊ हजार ७८३ टीसीएम पाण्याची साठवणूक क्षमताही वाढीस लागली आहे. यात मोठे काम होते, ते कळंबा तलावातील गाळ काढणे, जाखले व तमदलगेसह जोतिबा डोंगरावरील तलावांचे पुनरुज्जीवन करणे. यात चांगले यशही आले आहे.तथापि इतर लहानसहान कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडी केल्याने ही कामे केली होती का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गावागावांत झाली होती. लोकसहभागातून कामे करावयाची असताना आणि कुशल-अकुशलचा रेशो सांभाळायचा असतानाही जेसीबीसारख्या यंत्रांनी कामे झाले आहेत. ठेकेदारांना पोसण्याचे काम या योजनेने चांगल्या प्रकारे केले.

  • निवडलेली गावे : १८०
  • पाच वर्षांसाठीचा मंजूर आराखडा : ७१ कोटी ७७ लाख
  • आराखड्यानुसार मंजूर कामे : २३५४
  • पूर्ण झालेली कामे : २३५४
  • खर्च झालेला निधी : ५६ कोटी ५१ लाख ७४ हजार
  • सिंचन क्षमता : ९ हजार ७८३ टीसीएम

ही झाली कामेतलावांतील गाळ काढणे, शेततळे, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, सलग समतल व खोल चर अशी कामे झाली आहेत. 

जिल्ह्यात जलयुक्तचे शंभर टक्के काम झाले असून निधीही खर्च पडला आहे, शासनाने मागवलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा अहवाल पाठवला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर