शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सीबीएसई बारावीच्या ५५० विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:17 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळणार आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयावरून पालक, विद्यार्थ्यांनी शुक्रवारी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात १० शाळा उर्वरित पेपर रद्दबाबत पालक, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळणार आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयावरून पालक, विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.या बोर्डाकडून दि. २७ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे उर्वरित आणि ऐच्छिक विषयांचे पेपर स्थगित करण्यात आले. या पेपरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने गुरुवारी (दि. २५) जाहीर केला. त्यावर लोकमतने कोल्हापूर जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रतिक्रिया, किती विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार, आदींचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील एकूण १० शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेचे बहुतांश पेपर झाले आहेत. मराठी, हिंदी, भूगोल, इन्फर्मेटिक प्रॅक्टिस, बिझनेस स्टडीज, कॉम्प्युटर सायन्स, आदी पेपर रद्द करण्यात आले आहेत. या विषयांसाठी शाळांनी त्याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांची प्रगती नेमकी समजण्यासाठी आणि करिअरची दिशा ठरविण्याकरिता स्वत:च्या क्षमतेची माहिती होण्यासाठी परीक्षा होणे आवश्यक होते. शालेय शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नाही.- ललित गांधी, अध्यक्ष, महावीर एज्युकेशन सोसायटी

वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उर्वरित पेपर रद्दचा निर्णय अयोग्य ठरणारा आहे. सध्या अन्य इयत्तांचे विद्यार्थी हे वर्गात येत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखून अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य होते.- सीमा फाटक, पालक

कोरोनाच्या सद्य:स्थितीचा विचार करता ह्यसीबीएसईह्णने बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.- डॉ. सरदार जाधव,संचालक, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगाव

 

 

बारावीचे बहुतांश महत्त्वाचे पेपर पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून बोर्डाने उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मला योग्य वाटतो.- ऋषिकेश कुलकर्णी, विद्यार्थी

पेपर रद्द करून त्यांचे सरासरी गुण देण्याच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पेपरची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्यायला हवी होती.- राजेंद्र दायमा, अध्यक्ष, इंडीपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • बारावीच्या शाळा (सीनिअर सेकंडरी स्कूल) : १०
  • विद्यार्थिसंख्या : ५५०
  • दहावीच्या शाळा (सेकंडरी स्कूल) : २८
  • विद्यार्थिसंख्या : ३८००

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाkolhapurकोल्हापूर