शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

बालगृहांतील ५५ हजार मुले स्वगृही !

By admin | Updated: October 9, 2016 00:51 IST

बालविकास विभागाचा पुढाकार : अनुदान लाटण्याला घातला पायबंद

 विश्वास पाटील--  कोल्हापूर --राज्यातील ११०३ बालगृहांतील सुमारे ५५ हजारांहून जास्त मुलांना त्यांच्या मूले पालकांकडे सुपूर्द करण्यात महिला व बालविकास विभागास यश आले आहे. आता राज्यभरातील बालगृहांत १२ हजार ५०० मुले असून त्यांच्याही पालकांचा शोध घेण्यात येत आहे.महिला व बालविकास विभागाकडून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ च्या तरतुदीअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी निवासी व इतर अनुषंगिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शासकीय व स्वयंसेवी संस्थामार्फत बालगृहे चालविण्यात येतात. देशात सर्वाधिक बालगृहे आणि त्यांमध्ये राहणारी मुले ही महाराष्ट्रात आहेत. राज्यात ११०३ संस्था व ७० हजार मुले बालगृहांत राहत होती. एवढी संख्या अन्य कोणत्याच राज्यात नाही. बालहक्क न्याय कायदा २०१५ नुसार बालकाच्या संगोपनाची पहिली जबाबदारी जन्मदात्या पालकांची असते. त्यानंतर दत्तक पालक, संगोपनकर्ते पालक व या सर्वांना जमत नसेल तरच अंतिम जबाबदारी शासनाची असते; परंतु महाराष्ट्रात ही बालगृहे ही वसतिगृहेच बनल्याचे वास्तव तपासणीतून पुढे आले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या संस्थेतील बालकास प्रतिबालक दरमहा दिले जाणारे १२१५ रुपये अनुदान. ही परिस्थिती बदलून सरकारचा मूळ उद्देश सफल व्हावा यासाठी बालविकास विभागाने कंबर कसली.जून २०१६ मध्ये विभागाचे आयुक्त डॉ. के. एम. नागरगोजे यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर या मुलांना त्यांच्या पालकांकडे परत पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला.याबाबत बालविकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘आम्ही बालगृहात प्रवेश देणाऱ्या बालकल्याण समित्यांच्या सदस्यांची बैठक घेतली व त्यांना कायद्याची तरतूद नेमकी काय आहे, याबाबत माहिती दिली. मुलांना त्यांच्या कुटुंबातच पुनर्स्थापित करा. पर्याय नसेल तरच संस्थेत मुलांना दाखल करण्याचे आदेश द्या, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलांना त्यांच्या पालकांकडे पाठविणे आम्हांला शक्य झाले.’लुबाडणूक अशीहीबालगृहातील प्रवेश हा वर्षभर केव्हाही व्हायला हवा; परंतु इथे मात्र फक्त जूनमध्येच एकदम मुलांची गर्दी होत असे; कारण या संस्था वसतिगृहात प्रवेश देणे आहे, असे छापील फॉर्मच गावोगावी वाटून मुलांना या संस्थांमध्ये आणत असत. सरकारी अनदान लाटायचेच शिवाय पालकांकडून पुन्हा वेगळे शुल्क वसूल करायचे, असा हा गोरख धंदा राजरोजपणे सुरू असल्याचे तपासातून पुढे आले. त्यातही मुख्यत: मराठवाड्यात अशा संस्थांचे प्रमाण जास्त आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच ११८ बालगृहे आहेत.राज्यातील फक्त स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या ९६३ बालगृहांची शासनाने त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करून घेतली. त्यामध्ये आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या एकूण २१४ संस्थांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया शासनाने सुरु केली. परंतु तोपर्यंत त्यास संस्थाचालकांनी न्यायालयात आव्हान दिले. औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका (क्रमांक ६५७९/२०१५ व ६५२६/२०१५) प्रलंबित आहे.अद्यापही समाजात काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके आहेत. त्यांच्यासाठी शासनाने बालगृहांचा शेवटचा पर्याय म्हणूनच विचार करावा. अशा बालकांसाठी बालसंगोपन, फॉस्टर केअर, स्पॉन्सरशिप योजना सक्षमपणे राबविल्या पाहिजेत व त्यासाठी शासनाने पुरेशा निधीची तरतूद करावी.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फौंडेशन, कोल्हापूर