शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहांतील ५५ हजार मुले स्वगृही !

By admin | Updated: October 9, 2016 00:51 IST

बालविकास विभागाचा पुढाकार : अनुदान लाटण्याला घातला पायबंद

 विश्वास पाटील--  कोल्हापूर --राज्यातील ११०३ बालगृहांतील सुमारे ५५ हजारांहून जास्त मुलांना त्यांच्या मूले पालकांकडे सुपूर्द करण्यात महिला व बालविकास विभागास यश आले आहे. आता राज्यभरातील बालगृहांत १२ हजार ५०० मुले असून त्यांच्याही पालकांचा शोध घेण्यात येत आहे.महिला व बालविकास विभागाकडून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ च्या तरतुदीअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी निवासी व इतर अनुषंगिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शासकीय व स्वयंसेवी संस्थामार्फत बालगृहे चालविण्यात येतात. देशात सर्वाधिक बालगृहे आणि त्यांमध्ये राहणारी मुले ही महाराष्ट्रात आहेत. राज्यात ११०३ संस्था व ७० हजार मुले बालगृहांत राहत होती. एवढी संख्या अन्य कोणत्याच राज्यात नाही. बालहक्क न्याय कायदा २०१५ नुसार बालकाच्या संगोपनाची पहिली जबाबदारी जन्मदात्या पालकांची असते. त्यानंतर दत्तक पालक, संगोपनकर्ते पालक व या सर्वांना जमत नसेल तरच अंतिम जबाबदारी शासनाची असते; परंतु महाराष्ट्रात ही बालगृहे ही वसतिगृहेच बनल्याचे वास्तव तपासणीतून पुढे आले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या संस्थेतील बालकास प्रतिबालक दरमहा दिले जाणारे १२१५ रुपये अनुदान. ही परिस्थिती बदलून सरकारचा मूळ उद्देश सफल व्हावा यासाठी बालविकास विभागाने कंबर कसली.जून २०१६ मध्ये विभागाचे आयुक्त डॉ. के. एम. नागरगोजे यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर या मुलांना त्यांच्या पालकांकडे परत पाठविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला.याबाबत बालविकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘आम्ही बालगृहात प्रवेश देणाऱ्या बालकल्याण समित्यांच्या सदस्यांची बैठक घेतली व त्यांना कायद्याची तरतूद नेमकी काय आहे, याबाबत माहिती दिली. मुलांना त्यांच्या कुटुंबातच पुनर्स्थापित करा. पर्याय नसेल तरच संस्थेत मुलांना दाखल करण्याचे आदेश द्या, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलांना त्यांच्या पालकांकडे पाठविणे आम्हांला शक्य झाले.’लुबाडणूक अशीहीबालगृहातील प्रवेश हा वर्षभर केव्हाही व्हायला हवा; परंतु इथे मात्र फक्त जूनमध्येच एकदम मुलांची गर्दी होत असे; कारण या संस्था वसतिगृहात प्रवेश देणे आहे, असे छापील फॉर्मच गावोगावी वाटून मुलांना या संस्थांमध्ये आणत असत. सरकारी अनदान लाटायचेच शिवाय पालकांकडून पुन्हा वेगळे शुल्क वसूल करायचे, असा हा गोरख धंदा राजरोजपणे सुरू असल्याचे तपासातून पुढे आले. त्यातही मुख्यत: मराठवाड्यात अशा संस्थांचे प्रमाण जास्त आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच ११८ बालगृहे आहेत.राज्यातील फक्त स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या ९६३ बालगृहांची शासनाने त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करून घेतली. त्यामध्ये आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या एकूण २१४ संस्थांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया शासनाने सुरु केली. परंतु तोपर्यंत त्यास संस्थाचालकांनी न्यायालयात आव्हान दिले. औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका (क्रमांक ६५७९/२०१५ व ६५२६/२०१५) प्रलंबित आहे.अद्यापही समाजात काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके आहेत. त्यांच्यासाठी शासनाने बालगृहांचा शेवटचा पर्याय म्हणूनच विचार करावा. अशा बालकांसाठी बालसंगोपन, फॉस्टर केअर, स्पॉन्सरशिप योजना सक्षमपणे राबविल्या पाहिजेत व त्यासाठी शासनाने पुरेशा निधीची तरतूद करावी.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फौंडेशन, कोल्हापूर