शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

‘५५ कोटी नि गांधी हत्या’: गांधीजींबद्दल प्रेम, आस्था निर्माण करणारे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:23 IST

कोल्हापूर : मानवी मनाचा वेध घेत, महात्मा गांधीजींबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे काम करीत, महात्मा गांधीजींच्या कार्याचे समर्थन करण्याचे काम ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ व निर्मिती विचार मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कोल्हापूर : मानवी मनाचा वेध घेत, महात्मा गांधीजींबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे काम करीत, महात्मा गांधीजींच्या कार्याचे समर्थन करण्याचे काम ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ व निर्मिती विचार मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ७० वर्षांनंतर महात्मा गांधीजींच्या खुनाची वस्तुस्थिती ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्याबद्दलचे योगदान, त्यांच्या त्या काळातील संघर्षमय प्रवासासह ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हे नाटक महात्मा गांधीजींना भारत देशाचे, या देशावर प्रेम करणारे नेते म्हणून पुढे आणण्याचे काम करते. भारत देश, त्यातील विविधता, विविध राजकीय पक्ष, विविध विचारसरणी यांचा मागोवा घेत असताना महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेले वातावरण, त्यांची विचार करण्याची क्षमता यांवर भाष्य, या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. महात्मा गांधीजींना विरोध करणाऱ्या, त्यांना नाकारणाºया विचारसरणीच्या प्रक्रियेवरही हे नाटक भाष्य करते.विद्रोही लेखक पार्थ पोळके यांनी ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हा विषय अतिशय आस्थेने आणि प्रामाणिकपणे, इतिहासाचा आढावा घेत मांडला आहे. संशोधनाच्या पातळीवर पुरावे देत गांधीजींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात नवकलाकार असलेतरी त्यांनी केलेला हुबेहूबअभिनय लोकांच्या काळजाला भिडणारा आहे.या नाटकाचे लेखन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले आहे. दिग्दर्शक किरण पवार, निर्मिती शशी गाडे, रंगभूषा प्रशांत इंगवले, वेशभूषा स्नेहा धडवाई, तर संगीत ओमेस साठे यांचे आहे. नाटकाचे आयोजन रघुनाथ कांबळे, सुरेश केसरकर, करुणा मिणचेकर, कमलाकर सारंग, प्रभाकर पाटील, सुरेखा भोसले, अनिल म्हमाने यांनी केले होते. नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.