शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

५० डुकरांच्या रक्तनमुन्यांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:00 IST

‘निपाह’साठी प्रत्येक जिल्ह्यात उपाययोजना; वटवाघळांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना

कोल्हापूर : ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. आठ दिवसांत हे नमुने पुण्याला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठवायचे आहेत.केरळमध्ये ‘निपाह’च्या विषाणूंची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर लस, उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य वाढले असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनानेही पावले उचलली आहेत. डुकरे आणि वटवाघळांच्या माध्यमातून या रोगाचे विषाणू पसरत असल्याने या दोन घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.त्यानुसार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांचे रक्तनमुने घेऊन ते आठ दिवसांत पुण्याला चाचणीसाठी पाठवायचे आहेत. तसेच वटवाघळांच्या वस्तीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक तालुक्यासाठी पथक‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याला जलद प्रतिसाद पथक नेमण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये एक पशुसंवर्धन विभागाचा डॉक्टर आणि वटवाघळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.‘मास्क’ घालून रक्तनमुने घ्याडुकरांचे रक्तनमुने घेतानाही ‘एनक्यू ५’ हे विशिष्ट प्रकारचे मास्क वापरूनच रक्तनमुने घेण्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. अशा प्रकारचे मास्क हे विषाणू प्रतिबंधक असतात.खाण्याचा सोडा,चुना फवारणीज्या ठिकाणी वटवाघळांची वस्ती आहे, अशा झाडांखाली खाण्याचा सोडा आणि चुन्याच्या भुकटीची फवारणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वटवाघळांच्या विष्ठेतून या रोगाचा प्रसार होत असल्याने याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले असून, या फवारणीतून प्रसाराला प्रतिबंध होणार आहे. ही फवारणी तातडीने करावी, असेही फर्मान सोडण्यात आले आहे़

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू