शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज जोडणीसाठी ५० टक्के शेतकरी वेटिंगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व ...

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ कमी झाल्याने जोडणीची मोहीम स्लो ट्रॅकवर आली आहे. अजूनही ५० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असून, ही प्रतीक्षा किमान दिवाळीपर्यंत लांबणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत २० हजारपैकी ९ हजार २६६ वीज जाेडण्या पूर्ण होऊन शिवारात पाणी खेळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.

कृषीपंपाच्या वीज जोडणीचे आगाऊ पैसे भरुनदेखील महावितरणकडून वेळेत जोडण्या मिळत नसल्याचे गेल्या पाच वर्षांतील चित्र आहे. याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सातत्याने शेतकरी मोर्चे, आंदोलने केली आहेत, पण बैठकीत बसल्यानंतर जोडण्या लगेच देऊ, असे सांगून अधिकारी वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या कोल्हापूर परिमंडळातील प्रलंबित बीज जाेडण्यांचा आकडा २० हजारांवर गेला.

शेतकऱ्यांनी बोअर मारुन, नदीला पाईपलाईन टाकून, मोटर जोडून ठेवली आहे; पण केवळ वीज नाही म्हणून तीन-तीन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही यंत्रणा फारशी हलताना दिसत नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेली जाते. शेतकऱ्यांच्या संतापामुळे अखेर डिसेेंबरमध्ये जाहीर झालेल्या नव्या वीज जोडणी धोरणात प्रलंबित वीज जाेडण्या तातडीने देण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिल्या आहेत. तरीदेखील यंत्रणेचा वेग वाढताना दिसत नाही.

जिल्ह्यात २० हजारांवर वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी ९ हजार २६६ वीज जोडण्या गेल्या दहा महिन्यांत जोडण्यात आल्या आहेत, तर अजूनही १० हजार ३१५ जण प्रतीक्षेत आहेत. ही टक्केवारी ५० च्या वर जात असल्याने अजून निम्मे शेतकरी कनेक्शनच्या प्रतीक्षेतच आहेत. या जोडण्या केव्हापर्यंत पूर्ण होतील, याचे उत्तर आजच्याघडीला महावितरणकडे नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ अपुरे असल्याचाही परिणाम वीज जाेडणीच्या कामावर होत आहे. आता पुढील महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व काम थांबणार आहे. पाऊस ऑक्टोबर, नोव्हेबरपर्यंत लांबत असल्याचे अनुभव पाहता, आता दिवाळीनंतरच नव्या वीज जोडण्यांना मुहूर्त मिळणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या : ४ हजार ६४८

प्रलंबित वीज जोडण्या : ४ हजार ८३४

सांगली जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या: ४ हजार ६१८

प्रलंबित वीज जोडण्या: ५ हजार ४८१