शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

कृषीपंप वीज जोडणीसाठी ५० टक्के शेतकरी वेटिंगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व ...

कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ कमी झाल्याने जोडणीची मोहीम स्लो ट्रॅकवर आली आहे. अजूनही ५० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असून, ही प्रतीक्षा किमान दिवाळीपर्यंत लांबणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत २० हजारपैकी ९ हजार २६६ वीज जाेडण्या पूर्ण होऊन शिवारात पाणी खेळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.

कृषीपंपाच्या वीज जोडणीचे आगाऊ पैसे भरुनदेखील महावितरणकडून वेळेत जोडण्या मिळत नसल्याचे गेल्या पाच वर्षांतील चित्र आहे. याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सातत्याने शेतकरी मोर्चे, आंदोलने केली आहेत, पण बैठकीत बसल्यानंतर जोडण्या लगेच देऊ, असे सांगून अधिकारी वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या कोल्हापूर परिमंडळातील प्रलंबित बीज जाेडण्यांचा आकडा २० हजारांवर गेला.

शेतकऱ्यांनी बोअर मारुन, नदीला पाईपलाईन टाकून, मोटर जोडून ठेवली आहे; पण केवळ वीज नाही म्हणून तीन-तीन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही यंत्रणा फारशी हलताना दिसत नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेली जाते. शेतकऱ्यांच्या संतापामुळे अखेर डिसेेंबरमध्ये जाहीर झालेल्या नव्या वीज जोडणी धोरणात प्रलंबित वीज जाेडण्या तातडीने देण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिल्या आहेत. तरीदेखील यंत्रणेचा वेग वाढताना दिसत नाही.

जिल्ह्यात २० हजारांवर वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी ९ हजार २६६ वीज जोडण्या गेल्या दहा महिन्यांत जोडण्यात आल्या आहेत, तर अजूनही १० हजार ३१५ जण प्रतीक्षेत आहेत. ही टक्केवारी ५० च्या वर जात असल्याने अजून निम्मे शेतकरी कनेक्शनच्या प्रतीक्षेतच आहेत. या जोडण्या केव्हापर्यंत पूर्ण होतील, याचे उत्तर आजच्याघडीला महावितरणकडे नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ अपुरे असल्याचाही परिणाम वीज जाेडणीच्या कामावर होत आहे. आता पुढील महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व काम थांबणार आहे. पाऊस ऑक्टोबर, नोव्हेबरपर्यंत लांबत असल्याचे अनुभव पाहता, आता दिवाळीनंतरच नव्या वीज जोडण्यांना मुहूर्त मिळणार असल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या : ४ हजार ६४८

प्रलंबित वीज जोडण्या : ४ हजार ८३४

सांगली जिल्हा

झालेल्या वीज जोडण्या: ४ हजार ६१८

प्रलंबित वीज जोडण्या: ५ हजार ४८१