शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

५ लाख ८४ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद

By admin | Updated: April 4, 2015 00:16 IST

श्रीक्षेत्र गणपतीपुळे : सायंमहाप्रसादाची योजना दोन वर्षात यशस्वी

खालगाव : रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थानतर्फे १ एप्रिल २०१३ पासून सायंकाळी ७.१५ वाजता सुरु करण्यात आलेल्या ‘पुलाव’ या महाप्रसादाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल २०१५ रोजी या स्तुत्य व सेवाभावी प्रसादाच्या यशस्वी उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ५ लाख ८४ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती देवस्थानचे सचिव विनायक राऊत यांनी दिली.प्रसिद्ध श्री देव गणपतीपुळे, संस्थान येथे दरवर्षी लाखो भाविक श्रींचे दर्शनासाठी येत असतात. गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर, अथांग समुद्र, निसर्गरम्य वातावरण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवास व्यवस्था, देवस्थानची रमाबाई पेशवे निवास व्यवस्था, विविध हॉटेल्स, घोडागाडी, उंट, विविधांगी फोटोग्राफर्स, त्याचबरोबर देवस्थानतर्फे दुपारी १२.३० वाजता खिचडी महाप्रसाद अशा विविधांगी सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या हे गणपतीपुळे पर्यटन क्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी १२.३० वाजता मिळणारी खिचडी प्रसाद व सायंकाळी ७.१५ वाजता मिळणारा ‘पुलाव’ महाप्रसाद याला भाविकांची, पर्यटकांची, स्थानिक ग्रामस्थांचीही उपस्थिती असते. महाराष्ट्रातील विविध भागातून येणारे पर्यटक, भारतातील व परदेशातीलही पर्यटक मोठ्या भक्तिभावाने या प्रसादाला अत्यंत शांतपणे रांगेत उभे राहतात. देवस्थान कमिटीने अतिशय उत्तम नियोजनात येथील खिचडी व पुलाव महाप्रसाद सुरु केल्याने येथील भाविकांनी, पर्यटकांनी, शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी यांनी संस्थान श्री देव गणपतीपुळे संस्थेला मनापासून धन्यवाद दिले आहेत. योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांकडून मिळणाऱ्या सहकार्याचे स्वागत करण्यात येत आहे. (वार्ताहर)