शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

प्रस्ताव आल्यानंतरच ४५ रुपये अनुदान

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

साखर निर्यातीचे पैसे : जिल्ह्यातील कारखान्यांना ६५ कोटी ९७ लाख मिळणाार; अध्यादेशानंतर अनुदान नाही

कोपार्डे : हंगाम २०१५/१६ मधील एफ.आर.पी.तील ४५ रुपये प्रतिटन कपात करूनच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल अदा केली आहेत. केंद्राने एकूण साखर उत्पादनाच्या ११ टक्के साखर निर्यात केल्यानंतर हे अनुदान दिले जाईल, असे जाहीर केले होते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी त्याप्रमाणे साखर निर्यात केली असली तरी अनुदान मिळणार का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी १८ मे रोजी निघालेल्या अध्यादेशाप्रमाणे मेपर्यंत निर्यात करणाऱ्या कारखान्यांना प्रस्ताव दाखल करताच ४५ रुपये मिळण्याचे संकेत असल्याचे या उद्योगातील एका तज्ज्ञाने सांगितले. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, जागतिक व्यापार करारानुसार पक्क्या मालावर अनुदान देता येत नसल्याने केंद्र शासनाने गाळप उसाच्या प्रतिटन ४५ रुपये अनुदान जाहीर करीत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे जाहीर केले. यासाठी मात्र साखर कारखान्यांना एकूण उत्पादित साखरेच्या ११ टक्के साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांनाच हे अनुदान दिले जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) ३८ कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांनी ८० टक्क्यांच्यावर साखर दिलेल्या कोट्याप्रमाणे निर्यात केली आहे. (वार्ताहर)प्रस्तावच दाखल नाहीत तर अनुदान कसे मिळणार?कारखान्यांनी साखर निर्यातीचा दिलेला कोटा निर्यात केला आहे. त्याचे प्रस्ताव केंद्राला दाखल करावयाचे आहेत; पण ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने संपूर्ण हंगामातील गाळप, निर्यात याबाबत प्रस्ताव एकावेळी देऊ, अशी भूमिका कारखान्यांनी घेतल्याने केंद्राकडे प्रस्ताव गेल्याशिवाय ४५ रुपये अनुदान कसे मिळणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.