शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात नऊ महिन्यांत ४३ बालकांचा मृत्यू, आरोग्यमंत्री आबिटकरांची जबाबदारी वाढली

By भीमगोंड देसाई | Updated: January 13, 2025 15:21 IST

सर्वाधिक कोणत्या तालुक्यात.., शासकीय आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ४३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनाच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीनुसार सरासरी प्रत्येक महिन्याला चार बालके दगावली आहेत. सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शासकीय आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अजूनही माता, बालकांचा मृत्यू कमी करण्यात अपयश आल्याचेही समोर आले आहे.प्राथमिक, उपकेंद्रातर्फे ग्रामीण भागातील आणि शहरात महापालिका आरोग्य केंद्रातर्फे गर्भवतींची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा दिली जाते. दर महिन्याला तपासणी, उपचार आणि एक सोनोग्राफी मोफत केली जाते. जननी शिशू सुरक्षा योजनेतून गर्भवतींची ने-आण, वजन कमी असलेल्या बाळांवर विशेष उपचार मोफत दिले जातात. तरीही जिल्ह्यात माता, बालकांचेे मृत्यू कमी झालेले नाहीत.आतापर्यंत झालेल्या माता, बालक मृत्यू प्रकरणातील कारणांचा शोध आरोग्य प्रशासनाने घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संबंधित गर्भवतींमध्ये असलेला रक्तदाब, गरिबीमुळे खासगीतील संदर्भ सेवा शेवटच्या टप्प्यात न परवडणे, मुदतपूर्व प्रसूती, शेवटच्या टप्प्यातील स्कॅनिंग, सोनोग्राफी खासगीत करणे गर्भवतींना परवडत नाही, अशी प्रमुख कारणे माता, बालक मृत्यू प्रकरणात समोर आली आहेत.

आबिटकरांची जबाबदारी वाढली..राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. म्हणून भविष्यात तरी जिल्ह्यातील माता, बालकांचा मृत्यूचा आकडा शून्यावर येईल, अशी आशा, अपेक्षा अनेकांमध्ये वाढल्या आहेत.

नऊ महिन्यांत मृत्यू झालेल्या बाळांची संख्या तालुकानिहाय अशी :गडहिंग्लज : ०८पन्हाळा : ०७शिरोळ : ०६भुदरगड : ०५करवीर : ०४शाहूवाडी : ०४राधानगरी : ०३हातकणंगले :०२कागल : ०२आजरा : ०१चंदगड : ०१गगनबावडा : ००

कागलला ३ मातांचा मृत्यूगडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी तालुक्यात प्रत्येकी एक आणि कागल तालुक्यात तीन मातांचा मृत्यू गेल्या नऊ महिन्यांत झाले आहेत. नऊ तालुक्यांत एकही मातांचा मृत्यू झाल्याची नोंद शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नाही.

शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे माता, बालकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न असतो; पण मुदतपूर्व बाळंतपण, रक्तदाब अशा कारणांमुळे माता, बालकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. - डॉ. एफ. ए. देसाई, माता, बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारPrakash abitkarप्रकाश आबिटकर