शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

४० हजार गणेशमूर्ती, १४० टन निर्माल्य दान

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : महापालिका व समाजसेवी संघटनांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : दुष्काळाची गंभीरता आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून कोल्हापूरकरांनी दान केलेल्या ४० हजार २५० गणेशमूर्ती मंगळवारी महापालिकेच्यावतीने इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या, तर १४० टन निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले. घरगुती गणेशमूर्तींचे सोमवारी विसर्जन झाले. पुरोगामी कोल्हापूरचा वारसा जपत नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्ती पंचगंगा नदी किंवा तलावासारख्या जलाशयात विसर्जित न करता त्या दान केल्या. यामध्ये विभागीय कार्यालयांतर्गत गांधी मैदान येथे ११ हजार चाळीस, शिवाजी मार्केट येथे ७ हजार ९२०, राजारामपुरीत ५ हजार ५६०, ताराराणी मार्केट येथे ८ हजार २३०, अशा एकूण ३२ हजार ७५० गणेशमूर्ती कृत्रिम कुंड, काहिलींमध्ये विसर्जित करण्यात आल्या, तसेच ग्रामीण भागातील गोकुळ शिरगाव, कुशिरे, पोहाळे, केर्ले, माजगाव, पाचगाव या भागातील नागरिकांनी ७ हजार ५०० गणेशमूर्ती दान केल्या. अशा एकूण ४० हजार २५० गणेशमूर्ती महापालिकेच्यावतीने एकत्र करून इराणी खण व शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्यात आल्या. नागरिकांनी शंभर टक्के निर्माल्य दान केल्याने त्याची आकडेवारी १४० टनांवर गेली. या निर्माल्यातून फुले, फळे, प्रसाद, कापसाचे वस्त्रमाळ, आणि प्लास्टिकचे विलिगीकरण करण्यात आले. प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे तर निर्माल्य बावड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात तसेच एकटी संस्थेच्या मौजे नंदवाळ फाटा येथील जागेत खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे. मोहिमेत महापालिकेच्या पवडी विभागाचे दोनशे कर्मचारी, आरोग्य विभागाचे शंभर व इतर विभागांचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शंभर ट्रॅक्टर, १० डंपर व ४ जेसीबी अशी यंत्रणा तैनात होती.रंकाळ्यातील विसर्जित गणेशमूर्ती इराणी खणीत महापालिका व समाजसेवी संघटनांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत रंकाळ्यात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून त्या पुन्हा इराणी खणीत पर्यावरणप्रेमींनी विसर्जित केल्या. मंगळवारी सकाळीच निसर्गमित्र धनंजय नामजोशी यांच्या नियोजनाखाली दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील २५ हून अधिक तरुणांनी या विसर्जित गणेशमूर्ती पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळी सात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत जवळपास सहाशेहून अधिक गणेशमूर्ती रंकाळ्यातून बाहेर काढण्यात आल्या. मूर्तिदान आता बनली जनचळवळकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी पाणी प्रदूषण टाळून मोठ्या प्रमाणावर मूर्ती व निर्माल्य दान केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भाविकांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अंनिस, शिक्षण विभाग, महापालिका व समविचारी पक्ष संघटनांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. कालबाह्य रूढी, प्रथांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे टाळूनही सण साजरे करू शकतो. धर्माची विधायक चिकित्सा समाजास पुढे नेणारी आहे. सुरुवातीस धर्मांध प्रवृत्तींनी या उपक्रमास तीव्र विरोध केला. लोकांनी दान केलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडा, असाही आग्रह धरला. विज्ञानवादी कार्यकर्त्यांशी वाद घातले, परंतु आता मूर्ती दान व निर्माल्य दान ही जनचळवळ झाली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभले.