शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

४० हजार गणेशमूर्ती, १४० टन निर्माल्य दान

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : महापालिका व समाजसेवी संघटनांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : दुष्काळाची गंभीरता आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून कोल्हापूरकरांनी दान केलेल्या ४० हजार २५० गणेशमूर्ती मंगळवारी महापालिकेच्यावतीने इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या, तर १४० टन निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले. घरगुती गणेशमूर्तींचे सोमवारी विसर्जन झाले. पुरोगामी कोल्हापूरचा वारसा जपत नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्ती पंचगंगा नदी किंवा तलावासारख्या जलाशयात विसर्जित न करता त्या दान केल्या. यामध्ये विभागीय कार्यालयांतर्गत गांधी मैदान येथे ११ हजार चाळीस, शिवाजी मार्केट येथे ७ हजार ९२०, राजारामपुरीत ५ हजार ५६०, ताराराणी मार्केट येथे ८ हजार २३०, अशा एकूण ३२ हजार ७५० गणेशमूर्ती कृत्रिम कुंड, काहिलींमध्ये विसर्जित करण्यात आल्या, तसेच ग्रामीण भागातील गोकुळ शिरगाव, कुशिरे, पोहाळे, केर्ले, माजगाव, पाचगाव या भागातील नागरिकांनी ७ हजार ५०० गणेशमूर्ती दान केल्या. अशा एकूण ४० हजार २५० गणेशमूर्ती महापालिकेच्यावतीने एकत्र करून इराणी खण व शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्यात आल्या. नागरिकांनी शंभर टक्के निर्माल्य दान केल्याने त्याची आकडेवारी १४० टनांवर गेली. या निर्माल्यातून फुले, फळे, प्रसाद, कापसाचे वस्त्रमाळ, आणि प्लास्टिकचे विलिगीकरण करण्यात आले. प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे तर निर्माल्य बावड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात तसेच एकटी संस्थेच्या मौजे नंदवाळ फाटा येथील जागेत खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे. मोहिमेत महापालिकेच्या पवडी विभागाचे दोनशे कर्मचारी, आरोग्य विभागाचे शंभर व इतर विभागांचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शंभर ट्रॅक्टर, १० डंपर व ४ जेसीबी अशी यंत्रणा तैनात होती.रंकाळ्यातील विसर्जित गणेशमूर्ती इराणी खणीत महापालिका व समाजसेवी संघटनांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत रंकाळ्यात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून त्या पुन्हा इराणी खणीत पर्यावरणप्रेमींनी विसर्जित केल्या. मंगळवारी सकाळीच निसर्गमित्र धनंजय नामजोशी यांच्या नियोजनाखाली दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील २५ हून अधिक तरुणांनी या विसर्जित गणेशमूर्ती पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळी सात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत जवळपास सहाशेहून अधिक गणेशमूर्ती रंकाळ्यातून बाहेर काढण्यात आल्या. मूर्तिदान आता बनली जनचळवळकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी पाणी प्रदूषण टाळून मोठ्या प्रमाणावर मूर्ती व निर्माल्य दान केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भाविकांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अंनिस, शिक्षण विभाग, महापालिका व समविचारी पक्ष संघटनांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. कालबाह्य रूढी, प्रथांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे टाळूनही सण साजरे करू शकतो. धर्माची विधायक चिकित्सा समाजास पुढे नेणारी आहे. सुरुवातीस धर्मांध प्रवृत्तींनी या उपक्रमास तीव्र विरोध केला. लोकांनी दान केलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडा, असाही आग्रह धरला. विज्ञानवादी कार्यकर्त्यांशी वाद घातले, परंतु आता मूर्ती दान व निर्माल्य दान ही जनचळवळ झाली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभले.