शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार गणेशमूर्ती, १४० टन निर्माल्य दान

By admin | Updated: September 23, 2015 00:24 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : महापालिका व समाजसेवी संघटनांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : दुष्काळाची गंभीरता आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून कोल्हापूरकरांनी दान केलेल्या ४० हजार २५० गणेशमूर्ती मंगळवारी महापालिकेच्यावतीने इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या, तर १४० टन निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले. घरगुती गणेशमूर्तींचे सोमवारी विसर्जन झाले. पुरोगामी कोल्हापूरचा वारसा जपत नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्ती पंचगंगा नदी किंवा तलावासारख्या जलाशयात विसर्जित न करता त्या दान केल्या. यामध्ये विभागीय कार्यालयांतर्गत गांधी मैदान येथे ११ हजार चाळीस, शिवाजी मार्केट येथे ७ हजार ९२०, राजारामपुरीत ५ हजार ५६०, ताराराणी मार्केट येथे ८ हजार २३०, अशा एकूण ३२ हजार ७५० गणेशमूर्ती कृत्रिम कुंड, काहिलींमध्ये विसर्जित करण्यात आल्या, तसेच ग्रामीण भागातील गोकुळ शिरगाव, कुशिरे, पोहाळे, केर्ले, माजगाव, पाचगाव या भागातील नागरिकांनी ७ हजार ५०० गणेशमूर्ती दान केल्या. अशा एकूण ४० हजार २५० गणेशमूर्ती महापालिकेच्यावतीने एकत्र करून इराणी खण व शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्यात आल्या. नागरिकांनी शंभर टक्के निर्माल्य दान केल्याने त्याची आकडेवारी १४० टनांवर गेली. या निर्माल्यातून फुले, फळे, प्रसाद, कापसाचे वस्त्रमाळ, आणि प्लास्टिकचे विलिगीकरण करण्यात आले. प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे तर निर्माल्य बावड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात तसेच एकटी संस्थेच्या मौजे नंदवाळ फाटा येथील जागेत खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे. मोहिमेत महापालिकेच्या पवडी विभागाचे दोनशे कर्मचारी, आरोग्य विभागाचे शंभर व इतर विभागांचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शंभर ट्रॅक्टर, १० डंपर व ४ जेसीबी अशी यंत्रणा तैनात होती.रंकाळ्यातील विसर्जित गणेशमूर्ती इराणी खणीत महापालिका व समाजसेवी संघटनांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत रंकाळ्यात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून त्या पुन्हा इराणी खणीत पर्यावरणप्रेमींनी विसर्जित केल्या. मंगळवारी सकाळीच निसर्गमित्र धनंजय नामजोशी यांच्या नियोजनाखाली दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील २५ हून अधिक तरुणांनी या विसर्जित गणेशमूर्ती पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळी सात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत जवळपास सहाशेहून अधिक गणेशमूर्ती रंकाळ्यातून बाहेर काढण्यात आल्या. मूर्तिदान आता बनली जनचळवळकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी पाणी प्रदूषण टाळून मोठ्या प्रमाणावर मूर्ती व निर्माल्य दान केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भाविकांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अंनिस, शिक्षण विभाग, महापालिका व समविचारी पक्ष संघटनांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. कालबाह्य रूढी, प्रथांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे टाळूनही सण साजरे करू शकतो. धर्माची विधायक चिकित्सा समाजास पुढे नेणारी आहे. सुरुवातीस धर्मांध प्रवृत्तींनी या उपक्रमास तीव्र विरोध केला. लोकांनी दान केलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडा, असाही आग्रह धरला. विज्ञानवादी कार्यकर्त्यांशी वाद घातले, परंतु आता मूर्ती दान व निर्माल्य दान ही जनचळवळ झाली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभले.