शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्'ात ४० हजार एकर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य, सुरेश हाळवणकर, मुख्यमंत्र्यांकडे करणार निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:24 IST

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. त्यामुळे या निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली आहे. हीच मागणी घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, याबाबत तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचीही त्यांची मागणी आहे.

कोल्हापूर जिल्'ात सध्या जे प्रकल्प रखडलेत यातील बहुतांश प्रकल्पांना याआधीच्या युतीच्या शासनकाळातच परवानगी मिळाली होती. भाजपच्या पुढाकाराने गेल्या वर्षी तमनाकवाडा येथे पाणी परिषदही घेण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकल्पांसाठी निधी मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्'ाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास, कृषी, पुनर्वसन मंत्री व अधिकारी यांची खास बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार हाळवणकर यांनी केली आहे.

कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन आहे. आजअखेर सर्व प्रकल्पांमधून कोल्हापूर जिल्'ात १०० टीएमसी पाणी अडवले जाते. अजूनही १० टीएमसी पाणी अडवणे शक्य आहे. अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिबक सिंचन प्रकल्पाला २०१२ साली प्रशासकीय परवानगी मिळाली आहे.

० ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे असे स्थानिक स्तरावर १६७ लघुजलसिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. या सर्व प्रकल्पांमधून दोन टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो. २०१६ च्या आर्थिक मापदंडानुसार कोणत्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे रॉयल्टीची रक्कम भूसंपादन रक्कम वगळून सदर मापदंड वापरण्यास परवानगी मिळाल्यास सध्याचे मापदंड व्यवहार्य ठरतात. याबाबत तोडगा काढण्याची गरज आमदार हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.हत्ती गेला अन् शेपूट राहिले!नागनवाडी, उचंगी, आंबेओहोळ, झांबरे, सर्फनाला, धामणी, सोनुर्ले हे सात सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ २५ टक्के काम राहिल्याने प्रचंड मोठी रक्कम गुंतुनही पाणीसाठा मात्र करता येत नाही, अशी या प्रकल्पांची अवस्था आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार आहे. तसेच अंदाजे ४० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ८० हजार क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे.चंद्रकांतदादांच्या निवासस्थानी चर्चा शक्यआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आल्यानंतर थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. या ठिकाणी चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली आमदार हाळवणकर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची शक्यता असून, तेथे कोल्हापूर जिल्'ातील या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.हे प्रकल्प आहेत अर्धवटनागनवाडी (ता. भुदरगड), उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, किटवडे (ता. आजरा), सोनुर्ले (ता. शाहूवाडी), झांबरे, कांर्जिणे (ता. चंदगड), धामणी (ता. राधानगरी)