शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

कोल्हापूर जिल्'ात ४० हजार एकर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य, सुरेश हाळवणकर, मुख्यमंत्र्यांकडे करणार निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:24 IST

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे.

ठळक मुद्देसर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. त्यामुळे या निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली आहे. हीच मागणी घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, याबाबत तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचीही त्यांची मागणी आहे.

कोल्हापूर जिल्'ात सध्या जे प्रकल्प रखडलेत यातील बहुतांश प्रकल्पांना याआधीच्या युतीच्या शासनकाळातच परवानगी मिळाली होती. भाजपच्या पुढाकाराने गेल्या वर्षी तमनाकवाडा येथे पाणी परिषदही घेण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकल्पांसाठी निधी मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्'ाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास, कृषी, पुनर्वसन मंत्री व अधिकारी यांची खास बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार हाळवणकर यांनी केली आहे.

कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन आहे. आजअखेर सर्व प्रकल्पांमधून कोल्हापूर जिल्'ात १०० टीएमसी पाणी अडवले जाते. अजूनही १० टीएमसी पाणी अडवणे शक्य आहे. अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिबक सिंचन प्रकल्पाला २०१२ साली प्रशासकीय परवानगी मिळाली आहे.

० ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे असे स्थानिक स्तरावर १६७ लघुजलसिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. या सर्व प्रकल्पांमधून दोन टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो. २०१६ च्या आर्थिक मापदंडानुसार कोणत्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे रॉयल्टीची रक्कम भूसंपादन रक्कम वगळून सदर मापदंड वापरण्यास परवानगी मिळाल्यास सध्याचे मापदंड व्यवहार्य ठरतात. याबाबत तोडगा काढण्याची गरज आमदार हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.हत्ती गेला अन् शेपूट राहिले!नागनवाडी, उचंगी, आंबेओहोळ, झांबरे, सर्फनाला, धामणी, सोनुर्ले हे सात सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ २५ टक्के काम राहिल्याने प्रचंड मोठी रक्कम गुंतुनही पाणीसाठा मात्र करता येत नाही, अशी या प्रकल्पांची अवस्था आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार आहे. तसेच अंदाजे ४० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ८० हजार क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे.चंद्रकांतदादांच्या निवासस्थानी चर्चा शक्यआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आल्यानंतर थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. या ठिकाणी चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली आमदार हाळवणकर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची शक्यता असून, तेथे कोल्हापूर जिल्'ातील या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.हे प्रकल्प आहेत अर्धवटनागनवाडी (ता. भुदरगड), उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, किटवडे (ता. आजरा), सोनुर्ले (ता. शाहूवाडी), झांबरे, कांर्जिणे (ता. चंदगड), धामणी (ता. राधानगरी)