शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

कोल्हापूरला ४० अंश सेल्सिअसचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:26 IST

कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली ...

कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पाऊस पडेल, असे वाटत होते. तरीही वळवाने हुलकावणी दिली.गेल्या चार दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत आहे. किमान सकाळी ७ पर्यंत तरी हवेत थोडासा गारवा जाणवत होता. तोही नाहीसा झाल्याने रात्रीही नागरिकांना प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. गार वारे येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या, तरी वारे गरमच येत असल्याचा अनुभव गेल्या चार दिवसांपासून येत आहे.सकाळी आठनंतरच अंगातून घामाच्या धारा सुरू असून, सकाळी दहानंतर बाहेर पडायला नको वाटावे, अशी परिस्थिती आहे. सायंकाळी ५ वाजतादेखील अशीच परिस्थिती असून, ज्येष्ठ नागरिकांचेही फिरायला बाहेर पडण्याचे वेळापत्रक बदलले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये दिसणारे चित्र आता कोल्हापुरात दिसायला सुरुवात झाली असून, अनेकजण डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. येत्या चार दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.गेल्या आठ-१0 दिवसांत एकीकडे उष्मा जाणवत असताना त्या तुलनेत जोरदार वळीव झालेला नाही; त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा जाणवत आहे. या उष्म्यामुळे कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.