शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

आॅगस्टमध्ये ३८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू : गावपातळीवर राजकीय हालचाली गतिमान

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर-- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची मुदत मार्चमध्ये, नऊ ग्रामपंचायतींची मुदत जुलैत, तर ३८२ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट महिन्यात संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यातच सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील निवडणूक प्रशासन आतापासून तयारीला लागले आहे. तसेच गावपातळीवरील राजकीय हालचालींनाही सुरुवात झाली आहे.ग्रामपंचायतींची निवडणूक प्रत्येक पाच वर्षांनी असते. सध्या जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत होत असते. राजकीय कारकिर्द करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा आखाडा अतिशय महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायत सदस्यापासूनच राजकारणात प्रवेश केलेले भविष्यात आमदार, मंत्री, खासदार झाले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अतिशय चुरशीने आणि प्रतिष्ठेने लढती होत असतात. अटीतटीची लढत असल्यास उमेदवार पैसे खर्च करण्यासाठी हात ढिले सोडतात. परिणामी, पुढे मुदत संपण्याआधी सहा महिन्यांपासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.मार्च, जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गावांत इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवीत आहेत. बारशापासून निधनापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. प्रभागात आरक्षण कोणतेही पडो; तयारी मात्र सुरू केली आहे. महिला आरक्षण पडल्यास पत्नीला; नाही तर आपण स्वत: रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात येणारे इच्छुक सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचत आहे. प्रसंगी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मदत घेतली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे गैरकारभारासंबंधीच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून वाढल्या आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात चंदगड तालुक्यातील एक, तर जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील एक, आजरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा निवडणूक प्रशासन जोरदार तयारीत व्यस्त आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची पहिल्यांदा प्रभाग रचना होईल. आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. १५ जानावारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. आॅगस्टमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागेल. -किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)ग्रामपंचायतींची संख्या तालुकानिहाय अशी- करवीर ५३ कागल५२ पन्हाळा४१ शाहूवाडी३६ शिरोळ० हातकणंगले२०राधानगरी२०भुदरगड४५ गगनबावडा८ आजरा१९ गडहिंग्लज४८ चंदगड४०