शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
4
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
5
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
6
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
7
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
8
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
9
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
10
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
11
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
12
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
13
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
14
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
15
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
16
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
17
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
18
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
19
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
20
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक

आॅगस्टमध्ये ३८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू : गावपातळीवर राजकीय हालचाली गतिमान

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर-- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची मुदत मार्चमध्ये, नऊ ग्रामपंचायतींची मुदत जुलैत, तर ३८२ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट महिन्यात संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यातच सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील निवडणूक प्रशासन आतापासून तयारीला लागले आहे. तसेच गावपातळीवरील राजकीय हालचालींनाही सुरुवात झाली आहे.ग्रामपंचायतींची निवडणूक प्रत्येक पाच वर्षांनी असते. सध्या जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत होत असते. राजकीय कारकिर्द करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा आखाडा अतिशय महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायत सदस्यापासूनच राजकारणात प्रवेश केलेले भविष्यात आमदार, मंत्री, खासदार झाले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अतिशय चुरशीने आणि प्रतिष्ठेने लढती होत असतात. अटीतटीची लढत असल्यास उमेदवार पैसे खर्च करण्यासाठी हात ढिले सोडतात. परिणामी, पुढे मुदत संपण्याआधी सहा महिन्यांपासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.मार्च, जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गावांत इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवीत आहेत. बारशापासून निधनापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. प्रभागात आरक्षण कोणतेही पडो; तयारी मात्र सुरू केली आहे. महिला आरक्षण पडल्यास पत्नीला; नाही तर आपण स्वत: रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात येणारे इच्छुक सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचत आहे. प्रसंगी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मदत घेतली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे गैरकारभारासंबंधीच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून वाढल्या आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात चंदगड तालुक्यातील एक, तर जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील एक, आजरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा निवडणूक प्रशासन जोरदार तयारीत व्यस्त आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची पहिल्यांदा प्रभाग रचना होईल. आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. १५ जानावारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. आॅगस्टमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागेल. -किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)ग्रामपंचायतींची संख्या तालुकानिहाय अशी- करवीर ५३ कागल५२ पन्हाळा४१ शाहूवाडी३६ शिरोळ० हातकणंगले२०राधानगरी२०भुदरगड४५ गगनबावडा८ आजरा१९ गडहिंग्लज४८ चंदगड४०