शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आॅगस्टमध्ये ३८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू : गावपातळीवर राजकीय हालचाली गतिमान

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर-- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची मुदत मार्चमध्ये, नऊ ग्रामपंचायतींची मुदत जुलैत, तर ३८२ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट महिन्यात संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यातच सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील निवडणूक प्रशासन आतापासून तयारीला लागले आहे. तसेच गावपातळीवरील राजकीय हालचालींनाही सुरुवात झाली आहे.ग्रामपंचायतींची निवडणूक प्रत्येक पाच वर्षांनी असते. सध्या जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत होत असते. राजकीय कारकिर्द करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा आखाडा अतिशय महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायत सदस्यापासूनच राजकारणात प्रवेश केलेले भविष्यात आमदार, मंत्री, खासदार झाले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अतिशय चुरशीने आणि प्रतिष्ठेने लढती होत असतात. अटीतटीची लढत असल्यास उमेदवार पैसे खर्च करण्यासाठी हात ढिले सोडतात. परिणामी, पुढे मुदत संपण्याआधी सहा महिन्यांपासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.मार्च, जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गावांत इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवीत आहेत. बारशापासून निधनापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. प्रभागात आरक्षण कोणतेही पडो; तयारी मात्र सुरू केली आहे. महिला आरक्षण पडल्यास पत्नीला; नाही तर आपण स्वत: रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात येणारे इच्छुक सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचत आहे. प्रसंगी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मदत घेतली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे गैरकारभारासंबंधीच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून वाढल्या आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात चंदगड तालुक्यातील एक, तर जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील एक, आजरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा निवडणूक प्रशासन जोरदार तयारीत व्यस्त आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची पहिल्यांदा प्रभाग रचना होईल. आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. १५ जानावारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. आॅगस्टमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागेल. -किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)ग्रामपंचायतींची संख्या तालुकानिहाय अशी- करवीर ५३ कागल५२ पन्हाळा४१ शाहूवाडी३६ शिरोळ० हातकणंगले२०राधानगरी२०भुदरगड४५ गगनबावडा८ आजरा१९ गडहिंग्लज४८ चंदगड४०