शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

३७ कारखान्यांनी एफआरपी तटवली

By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST

१३ खासगी कारखाने : ८० टक्क्यांप्रमाणेही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी; दुष्काळाबरोबच आर्थिक झळ

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आहे, पण मुळात ८० टक्क्यांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. एफआरपी न देणाऱ्या राज्यातील ३७ सहकारी व खासगी कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा काढल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर विभागातील अकरा कारखान्यांचा समावेश आहे. शेतकरी संघटना व राज्य सरकार यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार यंदाच्या गळीत हंगामातील एफआरपीचा तिढा सुटला होता. पहिल्या टप्प्यात गाळपास आलेल्या उसाच्या बिलापोटी एकूण एफआरपीमधील ८० टक्के रक्कम, तर हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के रक्कम देण्यावर एकमत झाले होते. काही कारखान्यांनी पहिल्या टप्पातील एफआरपी मुदतीत दिली आहे; परंतु राज्यातील ३७ कारखान्यांनी एफआरपी तटविली आहे. त्यामध्ये १३ खासगी तर २४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक उसाचा पट्टा असणाऱ्या कोल्हापूर व पुणे विभागातील सहकारी कारखान्यांनीच एफआरपीची रक्कम थकवली आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात उसाचे पैसे मिळाले नाही, तर तो आणखीन अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साखरेचे दर वाढल्याने साखरेचे मूल्यांकनही वाढले असताना कारखाने पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी संघटनांचा रेट्यामुळे सरकारही आक्रमक झाले आहे. त्यामुळ उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आह. एफआरपी थकविलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या असून, शुक्रवारी (दि. २९) कार्यकारी संचालकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.