शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

३७ कारखान्यांनी एफआरपी तटवली

By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST

१३ खासगी कारखाने : ८० टक्क्यांप्रमाणेही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी; दुष्काळाबरोबच आर्थिक झळ

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आहे, पण मुळात ८० टक्क्यांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. एफआरपी न देणाऱ्या राज्यातील ३७ सहकारी व खासगी कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा काढल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर विभागातील अकरा कारखान्यांचा समावेश आहे. शेतकरी संघटना व राज्य सरकार यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार यंदाच्या गळीत हंगामातील एफआरपीचा तिढा सुटला होता. पहिल्या टप्प्यात गाळपास आलेल्या उसाच्या बिलापोटी एकूण एफआरपीमधील ८० टक्के रक्कम, तर हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के रक्कम देण्यावर एकमत झाले होते. काही कारखान्यांनी पहिल्या टप्पातील एफआरपी मुदतीत दिली आहे; परंतु राज्यातील ३७ कारखान्यांनी एफआरपी तटविली आहे. त्यामध्ये १३ खासगी तर २४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक उसाचा पट्टा असणाऱ्या कोल्हापूर व पुणे विभागातील सहकारी कारखान्यांनीच एफआरपीची रक्कम थकवली आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात उसाचे पैसे मिळाले नाही, तर तो आणखीन अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साखरेचे दर वाढल्याने साखरेचे मूल्यांकनही वाढले असताना कारखाने पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी संघटनांचा रेट्यामुळे सरकारही आक्रमक झाले आहे. त्यामुळ उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आह. एफआरपी थकविलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या असून, शुक्रवारी (दि. २९) कार्यकारी संचालकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.