शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ बालविवाह उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:55 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, मुलींची असुरक्षितता व बदनामी रोखण्यासाठी बालविवाहाचे चुकीचे पाऊल उचलले जात आहे. वर्षभरात ‘चाईल्ड लाईन’ने बालविवाहाची ३५ प्रकरणे उघडकीस आणली असून, हे प्रमाण ग्रामीण भागात व शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक आहे.कोल्हापुरात नुकतीच बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांचे प्रबोधन आणि कायदा करूनही बालविवाह रोखण्यात व्यवस्थेला यश आलेले नाही. यामागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ने केला आहे. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशी एक म्हण आहे; कारण वय वर्षे १४ ते १७ या कालावधीत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात.या किशोरावस्थेत मुला-मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असते. त्यातून दोघांचेही चुकीचे पाऊल पडते. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या गोष्टी घडतात. असे काही घडू नये, आपल्या मुलीची व कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पालक स्थळ बघून मुलीचे लग्नउरकून टाकतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की आपण सुटलो, अशी पालकांची भावना असते.अलीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पाहता लग्न करणे हा खबरदारीचा उपाय मानला जातो. हे प्रमाण ग्रामीण आणिशहरातील झोपÞडपट्टी भागांत जास्त आहे.शारीरिक,मानसिकदृष्ट्याही अक्षमपौगंडावस्थेत मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास झालेला नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नसतात. त्यामुळे या वयात झालेल्या विवाहानंतर दोघांवर अनेकदा पश्चात्तापाचीच वेळ येते. त्यामुळे शासनाने मुलींसाठी १८ आणि मुलांचे २१ हे सज्ञान वय धरले असून, त्या दृष्टीने ‘पोस्को’सारखे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यात अडकले की दोघांचे आणि कुटुंबीयांचेही आयुष्य पणाला लागते.समुपदेशन आणि सक्षमीकरण हाच उपायसगळ्या घटनांपासून मुलीला वाचवायचे असेल तर बालविवाहासारखे चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी किशोरावस्थेतच मुला-मुलींचे समुपदेशन, या वयात होणारे बदल, भविष्यातील धोके, करिअर याविषयी कौटुंबिक, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांची यात महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे शिक्षण आणि करिअरइतकेच प्रसंगी तिला समोर ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत, इतके सक्षमीकरण हा उपाय ठरणार आहे. मुलींनीही सावध राहिले पाहिजे. गरज वाटली तर समुपदेशनासाठी १०९८ या ‘चाईल्ड लाईन’च्या क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे, असे मत समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी व्यक्त केले.अत्याचारांचेवाढते प्रमाणएकीकडे स्त्री-पुरुष समानतेसाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रबोधन आणि प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भेदाभेदांची दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून ते युवती, महिलांवर होणाºया अत्याचाराचा वाढता आलेख आहे. छेडछाड, पाठलाग करणे, टवाळखोरी, मुलीला असुरक्षित वाटेल अशी वर्तणूक, विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटनांमुळे ग्रामीणच नव्हे तर शहरातील पालकांमध्येही मुलीच्या असुरक्षिततेची भावना प्रचंड आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी लवकर लग्न करणे हा उपाय मानला जातो.