शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ बालविवाह उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:55 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, मुलींची असुरक्षितता व बदनामी रोखण्यासाठी बालविवाहाचे चुकीचे पाऊल उचलले जात आहे. वर्षभरात ‘चाईल्ड लाईन’ने बालविवाहाची ३५ प्रकरणे उघडकीस आणली असून, हे प्रमाण ग्रामीण भागात व शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक आहे.कोल्हापुरात नुकतीच बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांचे प्रबोधन आणि कायदा करूनही बालविवाह रोखण्यात व्यवस्थेला यश आलेले नाही. यामागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ने केला आहे. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशी एक म्हण आहे; कारण वय वर्षे १४ ते १७ या कालावधीत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात.या किशोरावस्थेत मुला-मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असते. त्यातून दोघांचेही चुकीचे पाऊल पडते. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या गोष्टी घडतात. असे काही घडू नये, आपल्या मुलीची व कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पालक स्थळ बघून मुलीचे लग्नउरकून टाकतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की आपण सुटलो, अशी पालकांची भावना असते.अलीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पाहता लग्न करणे हा खबरदारीचा उपाय मानला जातो. हे प्रमाण ग्रामीण आणिशहरातील झोपÞडपट्टी भागांत जास्त आहे.शारीरिक,मानसिकदृष्ट्याही अक्षमपौगंडावस्थेत मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास झालेला नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नसतात. त्यामुळे या वयात झालेल्या विवाहानंतर दोघांवर अनेकदा पश्चात्तापाचीच वेळ येते. त्यामुळे शासनाने मुलींसाठी १८ आणि मुलांचे २१ हे सज्ञान वय धरले असून, त्या दृष्टीने ‘पोस्को’सारखे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यात अडकले की दोघांचे आणि कुटुंबीयांचेही आयुष्य पणाला लागते.समुपदेशन आणि सक्षमीकरण हाच उपायसगळ्या घटनांपासून मुलीला वाचवायचे असेल तर बालविवाहासारखे चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी किशोरावस्थेतच मुला-मुलींचे समुपदेशन, या वयात होणारे बदल, भविष्यातील धोके, करिअर याविषयी कौटुंबिक, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांची यात महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे शिक्षण आणि करिअरइतकेच प्रसंगी तिला समोर ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत, इतके सक्षमीकरण हा उपाय ठरणार आहे. मुलींनीही सावध राहिले पाहिजे. गरज वाटली तर समुपदेशनासाठी १०९८ या ‘चाईल्ड लाईन’च्या क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे, असे मत समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी व्यक्त केले.अत्याचारांचेवाढते प्रमाणएकीकडे स्त्री-पुरुष समानतेसाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रबोधन आणि प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भेदाभेदांची दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून ते युवती, महिलांवर होणाºया अत्याचाराचा वाढता आलेख आहे. छेडछाड, पाठलाग करणे, टवाळखोरी, मुलीला असुरक्षित वाटेल अशी वर्तणूक, विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटनांमुळे ग्रामीणच नव्हे तर शहरातील पालकांमध्येही मुलीच्या असुरक्षिततेची भावना प्रचंड आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी लवकर लग्न करणे हा उपाय मानला जातो.