शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ बालविवाह उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:55 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, मुलींची असुरक्षितता व बदनामी रोखण्यासाठी बालविवाहाचे चुकीचे पाऊल उचलले जात आहे. वर्षभरात ‘चाईल्ड लाईन’ने बालविवाहाची ३५ प्रकरणे उघडकीस आणली असून, हे प्रमाण ग्रामीण भागात व शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक आहे.कोल्हापुरात नुकतीच बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांचे प्रबोधन आणि कायदा करूनही बालविवाह रोखण्यात व्यवस्थेला यश आलेले नाही. यामागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ने केला आहे. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशी एक म्हण आहे; कारण वय वर्षे १४ ते १७ या कालावधीत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात.या किशोरावस्थेत मुला-मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असते. त्यातून दोघांचेही चुकीचे पाऊल पडते. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या गोष्टी घडतात. असे काही घडू नये, आपल्या मुलीची व कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पालक स्थळ बघून मुलीचे लग्नउरकून टाकतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की आपण सुटलो, अशी पालकांची भावना असते.अलीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पाहता लग्न करणे हा खबरदारीचा उपाय मानला जातो. हे प्रमाण ग्रामीण आणिशहरातील झोपÞडपट्टी भागांत जास्त आहे.शारीरिक,मानसिकदृष्ट्याही अक्षमपौगंडावस्थेत मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास झालेला नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नसतात. त्यामुळे या वयात झालेल्या विवाहानंतर दोघांवर अनेकदा पश्चात्तापाचीच वेळ येते. त्यामुळे शासनाने मुलींसाठी १८ आणि मुलांचे २१ हे सज्ञान वय धरले असून, त्या दृष्टीने ‘पोस्को’सारखे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यात अडकले की दोघांचे आणि कुटुंबीयांचेही आयुष्य पणाला लागते.समुपदेशन आणि सक्षमीकरण हाच उपायसगळ्या घटनांपासून मुलीला वाचवायचे असेल तर बालविवाहासारखे चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी किशोरावस्थेतच मुला-मुलींचे समुपदेशन, या वयात होणारे बदल, भविष्यातील धोके, करिअर याविषयी कौटुंबिक, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांची यात महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे शिक्षण आणि करिअरइतकेच प्रसंगी तिला समोर ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत, इतके सक्षमीकरण हा उपाय ठरणार आहे. मुलींनीही सावध राहिले पाहिजे. गरज वाटली तर समुपदेशनासाठी १०९८ या ‘चाईल्ड लाईन’च्या क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे, असे मत समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी व्यक्त केले.अत्याचारांचेवाढते प्रमाणएकीकडे स्त्री-पुरुष समानतेसाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रबोधन आणि प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भेदाभेदांची दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून ते युवती, महिलांवर होणाºया अत्याचाराचा वाढता आलेख आहे. छेडछाड, पाठलाग करणे, टवाळखोरी, मुलीला असुरक्षित वाटेल अशी वर्तणूक, विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटनांमुळे ग्रामीणच नव्हे तर शहरातील पालकांमध्येही मुलीच्या असुरक्षिततेची भावना प्रचंड आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी लवकर लग्न करणे हा उपाय मानला जातो.