शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

३३ टक्केच झाडांचे संवर्धन -: दहा हजार वृक्षारोपणाची गणतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:14 IST

सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार

ठळक मुद्दे इचलकरंजीतील नगरपालिकेचे चित्र

राजाराम पाटील ।इचलकरंजी : सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार असलेल्या पालिकेला यंदाही आणखी ३० हजार ५०० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शासनाने राज्यात शतकोटी वृक्षांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. वृक्षारोपणासाठी शहरी व ग्रामीण असे दोन गट आहेत. पैकी शहरी गटासाठी हरित शहर योजनेंतर्गत वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी नगरपालिकेला थेट अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानासाठी नगरपालिकेने निविदा काढून वृक्षारोपण व संवर्धन करावे, असा शासनाचा हेतू आहे.इचलकरंजी नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या १ कोटी २८ लाख रुपयांमध्ये पालिकेने दोन वेगवेगळ्या निविदा काढल्या. एका निविदेमध्ये नगरपालिकेने दिलेल्या जागा आणि ठरावीक रस्त्याकडेला वृक्षांचे रोपण करायचे आणि त्यांचे एक वर्ष संगोपन करण्याची जबाबदारी निविदाधारकाला देण्यात आली होती. दोन निविदांपैकी एक निविदा सांगली येथील एका मक्तेदाराला देण्यात आली. या मक्तेदाराने १ कोटी रुपयांमध्ये सात ते आठ फूट उंचीचे १४ हजार वृक्ष लावून त्याचे पुढे एक वर्ष संगोपन करावयाचे होते.

या मक्तेदाराने वृक्ष लावले. मात्र, नंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे १४ हजार वृक्षांपैकी ५ हजार ५०० वृक्ष जगल्याचे निदर्शनास आले. म्हणजे उद्दिष्टाच्या ३९ टक्के वृक्षसंवर्धन झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या मक्तेदाराला ३९ लाख रुपयेच देण्यात आले. वृक्षारोपण व संवर्धनासाठी आणखीन एक २८ लाख रुपयांची निविदा पुणे येथील कंपनीलादेण्यात आली. या मक्तेदाराने सात ते आठ फूट उंचीचे पाच हजार वृक्ष लावून त्यांचे एक वर्षापर्यंत संगोपन करणे अपेक्षित होते. मात्र, या मक्तेदाराने वृक्षारोपण केल्यानंतर  २१ लाख रुपये पेमेंट उचलले आणि तो गायब झाला. त्याने लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष शिल्लक आहेत, हे पाहण्याकरिता पालिकेने त्या वृक्षांची गणती केली. फक्त १४०० वृक्ष शिल्लक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करून उर्वरित रक्कम पालिकेने दिलीच नाही.

अशा प्रकारे दोन्ही मक्तेदारांच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीने नगरपालिकेला मात्र फटका बसला आहे. उद्दिष्टाच्या फक्त ३३.५ टक्के इतक्याच वृक्षांचे संगोपन झाल्याचे स्पष्ट झाले, तर गतवर्षी नगरपालिकेनेही दहा हजार वृक्ष लावण्याचे ठरविले होते. त्यासाठी नगरपालिकेने विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यक्ती यांच्या मागणीप्रमाणे वृक्षांची रोपे दिली. तसेच पालिकेच्या यंत्रणेमार्फतही शहरात वृक्ष लावण्यात आले. मात्र, या वृक्षांचे पुढे काय झाले, याची कोणत्याही प्रकारची नोंद नगरपालिकेकडे नाही, अशी माहिती उजेडात आली आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट द्यावेनगरपालिकेकडे १२०० अधिकारी व कर्मचारी आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यास शासकीय यंत्रणेने सांगितले तर पाच वर्षांत बारा हजार वृक्षांचे संगोपन होईल आणि हे उदाहरण राज्यातील अन्य नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी आदर्शवत ठरेल. म्हणून पालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांना किमान दोन वृक्षांचे संवर्धन करण्याची सक्ती करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. 

आणखीन आॅक्सिजन पार्कच्या उभारणीची अपेक्षाआॅक्सिजन पार्क म्हणून नगरपालिकेने शहीद भगतसिंग उद्यानालगत असलेल्या साडेपाच एकरांमध्ये ५ हजार ५०० वृक्ष आणि शहापूरमधील सावली सोसायटीजवळ अडीच एकर जागेत 

२ हजार ८०० वृक्ष लावले.गतवर्षी लावलेल्या या वृक्षांचे संगोपन नगरपालिकेनेच केले असून शंभर टक्के वृक्ष जगले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने त्यांच्याच आरक्षित जागेमध्ये वृक्षांचे रोपण व संवर्धन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना