शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Kolhapur, Sangli flood: ३२०० कोटींतून पूरबाधित वस्त्यांचे पुनर्वसन, महापूर नियंत्रण कृती आराखडा सादर

By भीमगोंड देसाई | Updated: March 10, 2025 18:55 IST

लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून अंतिम

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत सन २००५ नंतर आलेल्या महापुराचा अभ्यास करून महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या ३२०० कोटींच्या विकास आराखड्यातूून दरवर्षी पुराने बाधित होणाऱ्या वस्त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अशा दीर्घकालीन आणि तातडीच्या उपाययोजनांचा आराखडा नुकताच लोकप्रतिनिधींसमोर प्रशासनाने सादर केला आहे. हा आराखडा अंतिम झाल्यानंतर अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे.

सन २००५, २००६, २०१९, २०२१ मधील पूरस्थिती गंभीर झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील बाधित परिसरात प्रचंड हानी झाली. २०१९ साली तर ३००१ कोटींचे नुकसान झाले होते. यामुळे शासनाच्या जलसंधारण विभागाने पुढाकार घेऊन महापुराची कारणे शोधून त्यावरील उपाययोजनांचा ३२०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाल्याने आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या आराखड्यात प्रमुख्याने नदीपात्रात येणारा पाण्याचा विसर्ग नियंत्रित करणे, नदी-नाल्यांची नैसर्गिक वहन क्षमता वाढवणे, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता बळकट करणे, अद्यावत संगणकीय प्रणालीव्दारे धरण विसर्गाचे एकात्मिक परिचलन करणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मुक्त पाणलोट क्षेत्रात जलसंधारण व एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम मिशन मोडमध्ये राबविणे, नदी-नाल्यांत नैसर्गिक काटछेद तयार करणे, निवडक ठिकाणी नद्यांचे रूंदीकरण करणे, नदीपात्रातील अडथळे दूर करणे, पुलांचे हायड्रॉलिक ऑडिट करून वाढीव वहनक्षमता निर्माण करणे, पूर बांध बांधणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, इचलकरंजी महापालिका क्षेत्रांत स्टॉर्म वॉटर निचरा प्रणाली तयार करणे, जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे बळकटीकरण करणे, पुराची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा अद्यावत करणे, अशी कामे करण्यात येणार आहेत.

रेनवॉटर हार्वेस्टिंगवर भर

पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना अशा : शासकीय आणि महापालिकेच्या सर्व इमारती, मोठ्या संस्थांच्या इमारती, औद्योगिक वसाहतींमधील इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीने करणे, सोसायटीच्या इमारती, बंगला, घरावरही रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प बसवणे, अतिक्रमण टाळण्यासाठी बांधकाम परवानगीसाठी नाला क्लिअरन्स प्रमाणपत्र घेणे, पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी बांधकाम उपनियमांत बदल करणे, हरित इमारत संकल्पनेची अंमलबजावणी करणे.

राज्य सरकारचा हिस्सा ९३० कोटींचामहापूर नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तयार केलेल्या आराखड्यातील ३२०० कोटींतील ३० टक्के म्हणजे ९३० कोटींचा हिस्सा राज्य सरकारचा असणार आहे. उर्वरित २२४० कोटींच्या निधीसाठी जागतिक बँकेचे सहाय्य राहणार आहे. जागतिक बँक अनुदान देणार नाही तर कर्ज म्हणून देणार आहे. पण याचा स्पष्टपणे उल्लेख अजून झालेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीfloodपूर