शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Kolhapur: ३१५ रुपयांचा मासिक पास, मग कसली ही टोल माफी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 15:39 IST

वाहनधारकांची विचारणा : किणी परिसरातील २० किलोमीटरच्या गावांना लाभ

कोल्हापूर : किणी टोलनाक्यावरून परिसरातील २० किलोमीटरच्या परिघातील ग्रामस्थांकडून एकही रुपया टोल घेतला जाणार नाही; परंतु यासाठीच्या मासिक पाससाठी जी प्रक्रिया आहे त्याचा व्यवस्थापन खर्च म्हणून महिन्याला ३१५ रुपये द्यावे लागणार आहेत. या मासिक पासच्या आधारे नागरिक येथून प्रवास करू शकतील. त्यांना वेगळा टोल नसेल असे स्पष्टीकरण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. दरमहा हा पास काढायचा असेल तर मग काँग्रेसच्या आंदोलनानंतर टोल माफ झाला असे कसे म्हणता येईल, अशी विचारणा वाहनधारक करत आहेत.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात किणी टोलनाक्यावर रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल आणि अन्यायी टोल आकारणीबद्दल आंदोलन करण्यात आले हाेते. यावेळी आंदोलन मागे घेताना प्रकल्प संचालक पंदरकर यांच्या स्वाक्षरीने जे पत्र देण्यात आले होते त्यातील काही मुद्यांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून हे स्पष्टीकरण घेण्यात आले.पंदरकर म्हणाले, पाऊस कमी आल्यामुळे खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत ही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील. टोलमध्ये ५० टक्के सवलतीचा मुद्दा आंदोलकांनी मांडला होता. यातील २५ टक्के टोलमाफी रस्त्याचे काम जेव्हा सुरू केले तेव्हापासून सुरूच आहे. हे काम सुरू होण्याआधी ९० रुपये टोल होता. तो गेले वर्षभर ७० रुपये आहे. आणखी २५ टक्के टोलमाफीसाठी केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.ते म्हणाले, मासिक पासबाबत काही गैरसमज झाले आहेत. २० किलोमीटरच्या परिघातील गावांतील वाहनांना टोलमाफी कायद्यानुसार देण्यात आली आहे; परंतु मासिक पाससाठी संबंधित बँक, पास प्रक्रिया यासाठी महिन्याला ३१५ रुपये देऊन पास घ्यावा लागणार आहे. त्यामुळे टोलमाफी असली तरी प्रक्रिया शुल्क म्हणून ३१५ भरून मासिक पासचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे.

आधार कार्ड हवेच जर..ज्यांचे आधार कार्ड किणी टोलनाक्याच्या परिघातील २० गावांतील आहे अशांनाच या टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. अन्य ठिकाणचे आधारकार्ड असेल तर परिघातील गावांतील एखादा नागरिक असला तरी त्यांना पास देता येणार नाही. हा जर नियम असेल तर मग प्राधिकरण आधार कार्ड पाहूनच टोलमध्ये सवलत का देत नाही..? त्यासाठी दरमहा वेगळा पास काढण्याची काय गरज आहे? असेही या परिसरातील लोक विचारू लागले आहेत.

टोलनाक्यावरच होणार पासचे नूतनीकरणप्रत्येक महिन्याला जो पास देण्यात येणार आहे, त्याचे नूतनीकरण दर महिन्याला करावे लागणार आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होणार नाही का? अशी विचारणा केली असता, या पासचे नूतनीकरण टोलनाक्यावरच काही मिनिटांमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाका