शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

३०० ‘दादा-भार्इं’हद्दपार होणार

By admin | Updated: August 17, 2014 22:51 IST

गणेशोत्सवासाठी कारवाई : गुंडांचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गल्ली, चौकांत अथवा मंडळांच्या कट्ट्यांवर बसून ‘दादा-भार्इं’च्या जोरावर परिसरात दहशत माजविणाऱ्या सुमारे ३०० सराईत गुंडांना हद्दपार करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ज्या-त्या पोलीस ठाण्यांतर्गत हद्दपारीचे प्रस्ताव बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘दादा-भार्इं’ना आपला गाशा गुंडाळून बाहेरील जिल्ह्णात प्रस्थान करावे लागणार आहे. कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन दक्ष आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्यामुळे जिल्ह्णातील वातावरण तापले आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला गणेशोत्सवापासूनच सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मंडळांना वर्गणीच्या नावाखाली मोठ्या स्वरूपात देणग्या देऊन त्यांना आपल्या बाजूने बसविण्याची व्यूहरचना इच्छुक उमेदवारांनी आखली आहे. सर्वजण साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणार असल्याचे चित्र आहे. शहरासह उपनगरातील राजेंद्रनगर, जवाहरनगर, यादवनगर, साळोखे पार्क, लक्षतीर्थ वसाहत, वारे वसाहत, विचारेमाळ, सदर बझार, शाहूपुरी, विक्रमनगर, दौलतनगर, मंगळवार पेठ, आदी ठिकाणी गुन्हेगारी टोळक्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टी रहिवाशांचे या परिसरात मोठे बस्तान असल्याने येथील संस्कृतीच गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सुपारी घेऊन दिवसाढवळ्या चौकात, भररस्त्यावर मुडदे पाडण्यासाठी ते कधीच मागे पडत नाहीत. अशा काही गुन्हेगारांचा या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.खबरदारी म्हणून पोलीस रेकॉर्डवर असणाऱ्या शहरासह उपनगरांतील सुमारे ३०० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपविभागीय अधिकारी, करवीर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार या सर्व गुन्हेगारांना २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्णात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. गल्लीबोळांत, चौकात आणि परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘दादा-भाई’ यांची यादी तयार करून त्यांना जिल्ह्णाबाहेर तडिपार करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. - मनोजकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक)