शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

दरवर्षी १००० टन ई-कचरा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:17 IST

महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु

ठळक मुद्दे १०० टनांचाच पुनर्वापर; ई-कचरा जातो ओढ्या-नाल्यांत

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रोज जमा होणारा ओला आणि सुका कचरा एका जागेत साठवून त्याचे निराकरण केले जाते. तसेच बांधकाम क्षेत्रातील कचरा, रुग्णालयांचा जैव-वैद्यकीय कचरा, औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित कचºयाच्या विल्हेवाटीची यंत्रणा असली तरी आरोग्याला घातक असलेल्या दरवर्षी साठणा-या हजारो टन ई-कचºयाच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मात्र कोल्हापुरात नाही. हा कचरा चक्क नाला-ओढ्यांत टाकला जात असल्यामुळे कॅन्सरसह गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे.

आरोग्याला घातक असल्यामुळे ई-कचरा इतर कचºयाबरोबर टाकायचा नसतो किंवा जमिनीत गाडायचाही नसतो; परंतु अनेकांना हे माहीतच नसल्यामुळे हा कचरा शहरात इतस्तत: विखुरलेला दिसतो. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होत नाही. विशेषत: लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नरजवळील एका जागेत शहरातील सर्वाधिक ई-कचरा एकत्रित केला जातो, असा हजारो टन इ-कचरा साठून आहे.

ई-कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण टीव्ही, मोबाईलचेइलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून खराब झाली की त्यांचा ई-कचरा होतो. यामध्ये प्रामुख्याने टी.व्ही. संच, मोबाईल, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, सीडी, चार्जर व सर्व प्रकारच्या बॅटºया यांचा समावेश मोठा आहे. अशा प्रकारच्या जमा होणा-या कच-यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे टी.व्ही. आणि मोबाईलचे आहे.

किलोमागे जास्तीत जास्त पैसे मिळत असल्यामुळे आणि या कचऱ्याबाबत जनजागृती नसल्यामुळे अनेक नागरिक पैसे घेऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतात; कारण हा कचरा हे स्क्रॅपवाले त्यातील धातू काढून घेऊन घातकपणे नष्ट करतात आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.- मनोज मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी ई-सायकलर्स प्रा. लि.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर