शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

दरवर्षी १००० टन ई-कचरा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:17 IST

महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु

ठळक मुद्दे १०० टनांचाच पुनर्वापर; ई-कचरा जातो ओढ्या-नाल्यांत

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रोज जमा होणारा ओला आणि सुका कचरा एका जागेत साठवून त्याचे निराकरण केले जाते. तसेच बांधकाम क्षेत्रातील कचरा, रुग्णालयांचा जैव-वैद्यकीय कचरा, औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित कचºयाच्या विल्हेवाटीची यंत्रणा असली तरी आरोग्याला घातक असलेल्या दरवर्षी साठणा-या हजारो टन ई-कचºयाच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मात्र कोल्हापुरात नाही. हा कचरा चक्क नाला-ओढ्यांत टाकला जात असल्यामुळे कॅन्सरसह गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे.

आरोग्याला घातक असल्यामुळे ई-कचरा इतर कचºयाबरोबर टाकायचा नसतो किंवा जमिनीत गाडायचाही नसतो; परंतु अनेकांना हे माहीतच नसल्यामुळे हा कचरा शहरात इतस्तत: विखुरलेला दिसतो. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होत नाही. विशेषत: लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नरजवळील एका जागेत शहरातील सर्वाधिक ई-कचरा एकत्रित केला जातो, असा हजारो टन इ-कचरा साठून आहे.

ई-कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण टीव्ही, मोबाईलचेइलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून खराब झाली की त्यांचा ई-कचरा होतो. यामध्ये प्रामुख्याने टी.व्ही. संच, मोबाईल, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, सीडी, चार्जर व सर्व प्रकारच्या बॅटºया यांचा समावेश मोठा आहे. अशा प्रकारच्या जमा होणा-या कच-यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे टी.व्ही. आणि मोबाईलचे आहे.

किलोमागे जास्तीत जास्त पैसे मिळत असल्यामुळे आणि या कचऱ्याबाबत जनजागृती नसल्यामुळे अनेक नागरिक पैसे घेऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतात; कारण हा कचरा हे स्क्रॅपवाले त्यातील धातू काढून घेऊन घातकपणे नष्ट करतात आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.- मनोज मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी ई-सायकलर्स प्रा. लि.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर