शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावांत पाणी योजनेची कामे ठप्प

By admin | Updated: January 23, 2016 01:07 IST

चंदगड तालुक्यातील चित्र : दीड ते दोन वर्षांपासून या योजनांना निधीच नाही; कृत्रिम पाणीटंचाईला शासनच जबाबदार

नंदकुमार ढेरे -- चंदगड --शासनाच्या राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण टंचाई निवारण, आदी योजनांतून चंदगड तालुक्यातील २९ गावांत नळ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची कामे सुरू आहेत; पण गेली दीड-दोन वर्षे या योजनांना शासनाचा निधीच नसल्याने कामे ठप्प अवस्थेत आहेत. परिणामी, या गावांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २९ गावांना पाच कोटी आठ लाख रुपयांच्या निधीची गरज असून, शासनाने हा निधी त्वरित ग्रामपंचायतीकडे द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शासनाच्या निकषांनुसार तालुक्याचा टंचाईग्रस्त आराखडा तयार करून नळ पाणी योजनांची कामे ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू केली. २९ पैकी मिरवेल, पारगड, किटवाड, हिंडगाव, अलबादेवी, गुडेवाडी, कानूर खुर्द, लाकूरवाडी, मजरे कार्वे, जंगमहट्टी पैकी धनगरवाडा, शिरोली पैकी सत्तेवाडी, हिंडगाव पैकी फाटकवाडी, कोकरे पैकी अडुरे, कागणी, गणुचीवाडी या गावांतील कामे पूर्ण आहेत. मात्र, अंतिम निधीच ठेकेदारांना मिळाला नाही.ढेकोळी, करेकुंडी, दिंडलकोप, सुंडी, बुक्किहाळ, कौलगे, महिपाळगड, माणगाव पैकी मलगड, मुगळी, नूलकरवाडी, दाटे पैकी नाईकवस्ती, नांदवडे, होसूर, दाटे पैकी बेळेभाट या १३ गावांतील योजनांची कामे निम्म्यांहून अधिक झाली आहेत. १६ गावांतील कामे पूर्ण करणाऱ्या बहुतांश ठेकेदारांनीच या १३ गावांतील कामाचे ठेके घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही कामांत पैसे गुंतवून ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत.चंदगड तालुक्यात यावर्षी निम्म्यांहून अधिक पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीटंचाईचे संकट चंदगडकरावर आहे. त्यातच या योजनांना शासनाने निधीच देण्यास टाळाटाळ केल्याने पुन्हा कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाने ठेकेदारांना या कामांसाठी एक किंवा दोन हप्ते दिलेले आहेत.पाणीपुरवठा विभागाचा व ग्रामपंचायतींचा तगादा असल्याने ठेकेदारांनी स्वभांडवल गुंतवून या योजनांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. त्यातच दोन वर्षे शासनाने निधीच दिला नसल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. काही ठेकेदारांनी या कामासाठी कर्जाऊ रकमा घेतल्या आहेत. निधीच नसल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या विवंचनेत हे ठेकेदार आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून योजना पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ कार्यालयाकडे तगादा लावला जातो. कामे पूर्ण झाल्यानंतरही निधी देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे.यावर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने २९ गावांच्या नळ पाणी योजनासाठी प्रलंबित असलेली पाच कोटी आठ लाखांचा निधी या महिनाअखेर दिल्यास प्रगतिपथावर असलेली नळ पाणी योजना पूर्ण होऊन काही प्रमाणात पाणीटंचाई कमी होईल.संभाव्य पाणीटंचाई तालुक्याला जाणवणार म्हणून पाणीपुरवठा विभागाने संबंधित गावांतील पाणी योजनेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांना कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावला जात आहे. मात्र, निधीच नसल्याचे सांगत ठेकेदार कार्यालयाकडे पाठ फिरवित आहेत. निधीची तरतूद करा, मगच कामे करू, असा पवित्रा या ठेकेदारांनी घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाला निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.- शांताराम पाटील, उपसभापती, चंदगड पंचायत समिती.