शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

व्याज परताव्याचे २७ कोटी प्रलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:00 IST

कोल्हापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील २७ कोटी ३२ लाखाचा व्याज परतावा सरकारच्या पातळीवर प्रलंबीत आहे. विकास संस्थांनी संबधित कर्जदार शेतकºयांकडून व्याज वसुल केलेले आहे.दुसरे आर्थिक वर्ष संपले तरी अद्याप २०१५-१६ मधील व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार शेतकरी परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.लहरी हवामान व सातत्याने ...

ठळक मुद्देपावणे दोन लाख शेतकºयांना प्रतिक्षा परतावा येईल त्यावेळीच पदरात

कोल्हापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील २७ कोटी ३२ लाखाचा व्याज परतावा सरकारच्या पातळीवर प्रलंबीत आहे. विकास संस्थांनी संबधित कर्जदार शेतकºयांकडून व्याज वसुल केलेले आहे.दुसरे आर्थिक वर्ष संपले तरी अद्याप २०१५-१६ मधील व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील एक लाख ८४ हजार शेतकरी परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.

लहरी हवामान व सातत्याने होणारी नापीकीमुळे शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली दबला जातो. त्यातून आत्महत्याचे लोन वाढत असल्याने शेतकºयांना मदत करण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरू केली. त्यात केंद्र सरकारनेही सहभाग घेऊन शेतकºयांना एक लाखा पर्यंत कर्जाची उचल करणाºया शुन्य टक्के तर एक लाखापेक्षा अधिक व तीन लाखापर्यंत कर्जाची उचल करणाºयांना ३ टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जातो. एक लाखापर्यंतच्या कर्जाचे तीन-तीन टक्के व्याज केंद्र व राज्य सरकार देते; तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे तीन टक्के केंद्र व एक टक्का व्याज राज्य सरकार बॅँकांना देते.

त्यामुळे विकास संस्थांनी शेतकºयांकडून या व्याजदरानेच आकारणी करावी, अशी ही व्याज सवलत योजना सांगते; पण वित्तीय संस्थांना दोन-दोन वर्षे व्याज मिळत नसल्याने त्यांची शेतकºयांकडून वसुली सुरू आहे. सरकार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सवलतीच्या रकमेची तरतूद करते. ज्या शेतकºयांनी मुदतीत परतफेड केली आहे, त्यांचे प्रस्ताव संबधित वित्तीय संस्थांकडून सहायक निबंधकांकडे पाठविले जातात. त्यांच्याकडून तपासणी होऊन जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून सरकारकडे पाठविले जातात.जिल्ह्यातील सुमारे पावणे तीन लाख शेतकरी दोन हजार कोटीचे पीक कर्ज घेतात. त्यापैकी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून १३०० कोटी, तर इतर बॅँकांतून ७०० कोटी पीक कर्ज वितरित केले जाते.

साधारणता कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास दरवर्षी पावणे दोन लाख शेतकरी व्याज सवलत योजनेत सहभागी होतात. काही संस्थांचा अपवाद वगळता २०१४-१५ या आर्थिक वर्षातील परतावा शेतकºयांना मिळालेला आहे. पण २०१५-१६ या आर्थिक वर्षातील १४३९ संस्थांच्या १ लाख ८४ हजार शेतकºयांचे २७ कोटी ३२ लाखाचे व्याज अद्याप मिळालेले नाही. दुसरे आर्थिक वर्ष संपून पाच महिने झाले, या आर्थिक वर्षात प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू असताना त्या मागील व्याज परतावा न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.परतावा येईल त्यावेळीच पदरात

सरकारकडून ज्या त्या वर्षातील व्याज परतावा मिळत नसल्याने विकास संस्थांना ताळेबंद बांधताना अडचण होते. त्यामुळे संस्था शेतकºयांकडून वसुल करते. सरकारकडून परतावा येईल त्यावेळीच शेतकºयांचा पदरात पडतो.