शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण १८५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २६८६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे १४९४, वाणिज्य मराठीचे ४६५, वाणिज्य इंग्रजीचे ४६१, कला मराठीचे २४६, तर कला इंग्रजीसाठीच्या २० अर्जांचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी राजारामपुरी, मिरजकर तिकटी, नागाळा पार्क, निवृत्ती चौक, आदींसह उपनगरांमधील नेटकॅफेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासह त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
पॉईंटर
विद्याशाखानिहाय एकूण अर्ज
विज्ञान : २५६९
वाणिज्य (मराठी) : ७३८
वाणिज्य (इंग्रजी) : ८१५
कला (मराठी) : ३७८
कला (इंग्रजी) : ३६
एकूण : ४५३६