शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कसबा बावड्यात २५ जणांना डेंग्यूची लागण

By admin | Updated: May 19, 2016 00:59 IST

नागरिकांत भीती : महापालिकेकडून सर्वेक्षण; तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना

कसबा बावडा : कसबा बावडा आणि परिसरात डेंग्यूच्या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या २५हून अधिक रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रुग्ण कसबा बावडा आणि कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी बावड्यातील नगरसेवकांनी महापालिका आरोग्य विभागाला लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत.कसबा बावडा, लाईन बाजार, शुगरमिल, आदी परिसरातील लोकांना डेंग्यू झाला असल्याने डेंग्यूचा विळखा काही ठरावीक भागातच झाला असल्याचे स्पष्ट होते. ) संपूर्ण बावडा परिसरालाच डेंग्यूने विळखा घातलेला आहे. दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बावड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले. नंतर त्यात वाढ होत गेली. आता तर २५हून अधिक जणांना डेंग्यू झाल्याचे त्यांच्या रक्ताच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.महापालिकेने याबाबत काही तरी उपाययोजना करावी, यासाठी स्थानिक नगरसेवकांनी महापौर, तसेच आरोग्याधिकारी यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभगाकडील कर्मचाऱ्यांनी बावड्यातील लॅबना भेटी देऊन रुग्णांची माहिती घेतली.डेंग्यूचा प्रसार होत असताना महापालिका प्रशासनाकडून केवळ आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या डासांचा उपद्रव वाढला आहे. पाटील गल्लीतील सहाजणांना डेंग्यूमूळ गावठाणातील असलेल्या पाटील गल्लीत डेंग्यूचे सध्या सहा रुग्ण आहेत. यामध्ये तरुण मुले, महिला व काही लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.हत्तीरोग पसरविणारे डासहीबावड्यातील डेंग्यूचे रूग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेचे कर्मचारी आणि मलेरिया निर्मुलन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली. पाण्याचे नमुने घेतले. यावेळी त्यांना डेंग्यूच्या डासांबरोबरच क्युनेक्स हे हत्तीरोग पसरवणारे डासही आढळले असल्याचे सांगण्यात आले. बावड्यात डेंग्यूची साथ झपाट्याने वाढत आहे. सध्या २५हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आहेत. अद्याप काही रुग्णांचे रक्ताचे रिपोर्ट यावयाचे आहेत. महापालिका प्रशासनाकडे याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात म्हणून आरोग्य विभागाला लक्ष घालण्यास सांगितले आहे. तसेच महापौरांनाही याची माहिती दिली आहे. - मोहन सालपे, नगरसेवकअस्वच्छता आणि खूप दिवस साठवलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांचा फैलाव होऊन डेंग्युची साथ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी साठवणुकीचे पाणी उघडे ठेवू नये. तसेच ते वारंवार बदलत राहायला हवे. - डॉ. नितीन पाटील, कसबा बावडागेल्या दीड महिन्यांत कसबा बावड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता चार रुग्णांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. सध्याच्या परिस्थितीत सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यापैकी एका रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने कसबा बावड्यात स्वच्छता मोहीम घेऊन औषध फवारणी केली आहे. साचलेल्या पाण्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात, हेही डेंग्यू पसरण्याला मदत करते. महापालिकेच्यावतीने सर्व पातळीवर दक्षता घेतली आहे. - डॉ. ए. डी. वाडेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोमनपा.