शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

अडीच लाख बालके ‘आधार’विना

By admin | Updated: May 19, 2015 00:23 IST

जिल्ह्यात जूनअखेर उपक्रम : प्रशासनाची व्यापक मोहीम मात्र, यंत्रणा तोकडी

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटांतील एक लाख ८६ हजार ८७०, तर सहा ते १४ वयोगटांतील ७३ हजार ९६३, अशी एकूण दोन लाख ६० हजार ८३३ बालके आधारकार्डविना असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व बालकांच्या आधारकार्डसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची मोहीम सध्या सुरू आहे. जूनअखेर सर्वांना आधारकार्ड देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, यंत्रणा तोकडी असल्यामुळे सर्व बालकांना ‘आधार’ देणे आव्हानात्मक बनले आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यास आधार कार्ड देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. शून्य ते पाच वयोगटांतील बालकांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित आहार व आरोग्याची सुविधा पुरवली जाते. सहा ते १४ वयोगटांतील मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापूर्वी शिक्षण प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. मात्र, नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची माहिती मिळत नव्हती. दरम्यान, नेमकेपणाने शाळाबाह्य मुलांची संख्या कळावी आणि प्रत्येक बालकाच्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लक्ष ठेवता यावे, तसेच लाभार्थी निश्चित करणे सोपे जावे, यासाठी शून्य ते १४ वयोगटांतील प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यापासून एकात्मिक बाल विकास, प्राथमिक व माध्यमिक या विभागाचे प्रशासन तयारी करीत आहे. एकूण असलेल्या बालकांमध्ये आधारकार्ड असलेल्यांचा आणि नसलेल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये शून्य ते पाच वयोगटांतील एकूण दोन लाख सहा हजार ५४१ पैकी १९ हजार ६७१ बालकांकडे आधारकार्ड आहे; तर सहा ते १४ वयोगटांतील दोन लाख ७४ हजार ५८२ पैकी दोन लाख ११ हजार ४९ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहे. आता सर्व बालकांना आधारकार्डसाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन अर्ज भरून घेण्याचे गावनिहाय नियोजन केले आहे. मात्र, मशीन व मनुष्यबळ यांची कमतरता भासत आहे. शून्य ते पाच वयोगटांतील बालकांच्या आधारकार्डसाठीचे आॅनलाईन अर्ज भरतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जूनअखेर सर्व बालकांना ‘आधार’ देणे आव्हानात्मक झाले आहे.करवीर तालुक्यात सर्वाधिक बालकेआधारकार्ड नसलेल्या शून्य ते पाच वयोगटांतील बालकांची, तर कंसात सहा ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ३३२७ (७२३), भुदरगड - ९५५८ (५१९७), चंदगड - १२४३३ (५४२९), गडहिंग्लज - १२५२५ (६२६८), गगनबावडा - २३९६ (१४२५), हातकणंगले - २६४०३ (१५९७८), कागल - १६९२२ (१०१५४), करवीर - ४१७२९ (१०७०७), पन्हाळा - १७८८० (४४९७), राधानगरी - ११९४२ (४९४८), शाहूवाडी - १२४६५ (४६४१), शिरोळ - १९२९३ (४७१९). सर्व बालकांना आधारकार्ड मिळावे, यासाठी गावनिहाय आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. अनेक गावांत केंद्रे सुरू झाली आहेत. जूनअखेर सर्व बालकांना आधार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. - स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी.जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा शून्य ते पाच वयोगटांतील बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी केंद्र सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. - शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण.