शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीचे २४२२ आॅनलाईन अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:39 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आहे. येत्या दोन दिवसांत कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर दिवसाला १० हजारांपर्यंत अर्ज भरून घेतले जाऊ शकतात.

ठळक मुद्दे‘नेटझीन’ मशीन कनेक्टिव्हिटीनंतर गती पकडणार दहा हजार आॅफलाईन प्रस्तावनिकषांत बसणाºया शेतकºयांनाच लाभ जिल्ह्यात १११० महाआॅनलाईन- सेतू, सीएससी व ग्रामपंचायत सेवा केंद्रे

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून २४२२ आॅनलाईन अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. शेतकºयांनी विकास संस्थांच्या माध्यमातून सुमारे १० हजार आॅफलाईन अर्ज भरले असून, ९५० ‘नेटझीन’ मशीन कनेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्याची गती मंदावली आहे. येत्या दोन दिवसांत कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर दिवसाला १० हजारांपर्यंत अर्ज भरून घेतले जाऊ शकतात.

सरकारने २००९ पासून थकबाकीदार असणाºया शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी शासनाने निकष लावले असून, या निकषांत बसणाºया शेतकºयांनाच याचा लाभ होणार आहे. यासाठी पात्र शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत.

जिल्ह्यात १११० महाआॅनलाईन- सेतू, सीएससी व ग्रामपंचायत सेवा केंद्रे आहेत. सुरुवातीच्या काळात ‘मंत्रा’ची दहा मशीन उपलब्ध करून दिली होती, त्यामुळे आॅनलाईन अर्जांची गती कमी आहे. आतापर्यंत २४२२ आॅनलाईन, तर १० हजार आॅफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत फॉर्म भरून घेण्यास गती येईल.

काय आहे अडचण?

शेतकºयांचा कर्जमाफीच्या आॅनलाईन फॉर्ममध्ये आधार क्रमांक भरावा लागतो. तो भरल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ (तात्पुरता पासवर्ड) येतो. हा पासवर्ड भरला की लगेच त्या शेतकºयाची माहिती भरता येते; पण अनेक शेतकºयांचे स्वत:चे मोबाईल नाहीत. आधार कार्ड काढताना त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक त्यांच्या लक्षात नसल्याने गोची झाली आहे.

नेटझीन सक्रिय झाल्यानंतर...

नेटझीन मशीनला आधार क्रमांक व मोबाईलची गरज भासणार नाही. थेट संबंधित शेतकºयांचे थम्ब (अंगठ्याचा ठसा) घेतल्यानंतर त्याचा संपूर्ण डाटा तत्काळ खुला होणार आहे. त्यामुळे माहिती भरण्याचे काम गतीने होणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ‘नेटझीन’ची कनेक्टिव्हिटी होईल, असा अंदाज आहे.

केंद्र आॅनलाईन अर्ज

सीएससी १२००महा-ई सेवा ८००ग्रामपंचायत ४२२एकूण - २४२२पात्र शेतकºयांकडून आॅफलाईन अर्ज भरून घेण्याची सूचना विकास संस्थांना दिलेली आहे. परिपूर्ण अर्ज घेऊन शेतकरी जवळच्या केंद्रावर जाऊन आॅनलाईन माहिती भरू शकेल.- अरुण काकडे,जिल्हा उपनिबंधक