शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आयकर भरणाऱ्या ३८३२ शेतकऱ्यांपैकी ३४०० शेतकऱ्यांनी दोन कोटी ४० लाख रुपये सरकारला परत केले आहेत. उर्वरित ४३२ शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी मंगळवार (दि. ८)पर्यंत मुदत दिली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यातून पाच लाख ३७ हजार २१ शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेत सहभाग घेतला हाेता. चुकीची माहिती भरून पेन्शन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या वतीने संबंधित खात्यांची चौकशी सुरू केली. यामध्ये निकषांचे उल्लंघन केलेले १८ हजार लाभार्थी आढळले. त्यांमध्ये ३८३२ शेतकरी हे आयकर भरणारे असल्याचे स्पष्ट झाले. आयकर विभागानेच ही यादी दिल्याने शासनाकडून त्यांची वसुली सुरू केली. संबंधित शेतकऱ्यांना लाभ घेतलेली रक्कम परत करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत ३४०० शेतकऱ्यांनी २ कोटी ४० लाख रुपये शासनाला परत केले आहेत. अजून ४३२ शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महसूल यंत्रणा त्यात गुंतली होती. त्यात काही सुट्या आल्याने आणखी तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत पैसे भरले नाहीत तर बुधवारपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आयकर भरणाऱ्यांसह जमीन नावावर नसलेले, तरुण, पती-पत्नी दुहेरी लाभ घेतलेलेही आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या श्रावणबाळ, संजय गांधीसह इतर पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ३७५० लोकांनी ‘पी. एम. किसान’चा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडूनही वसुली केली जाणार आहे. त्यांना आठवड्यात नोटिसा काढून डिसेंंबरअखेर वसुली केली जाणार आहे.

कारवाईची शेतकऱ्यांमध्ये धास्ती

शासनाने पैसे परत न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. त्यामुळेच आयकर भरणाऱ्यांनी तातडीने पैसे परत केले.

लाभार्थ्याकडून पैसे वसूल करण्याची पहिलीच वेळ

चुकीच्या पद्धतीने शासकीय अनुदान घेतलेल्यांकडून वसुलीच्या घटना घडल्या असतील. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली करण्याची ही पहिलीच वेळ आहे.