शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बहिरेवाडीत २२ शेळ्यांचा मृत्यू

By admin | Updated: November 15, 2014 00:14 IST

दोन लाखांचे नुकसान : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील भगवान सखाराम सातपुते यांच्या शेळीपालन कळपातील २२ शेळ्यांचा शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे दोन लाखांवर नुकसान झाले असून, शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शेळ्यांच्या आजारपणाबाबत कोणतेही प्रयत्न होत नसल्याने इतर शेळ्यांच्या बाबतीत सातपुते कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत.बहिरेवाडी येथे भगवान सातपुते गेल्या सात वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करतात. १० आॅक्टोबरला या कळपातील एका शेळीचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही आणखी एका शेळीचा मृत्यू झाला. म्हणून मृत शेळीस कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. शेळीचे सॅम्पल तपासणीसाठी डॉक्टरांनी घेतले; परंतु सातपुते यांना सॅम्पल घेतलेच नाही. त्यामुळे रिपोर्ट देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. आजाराचे कोणतेही कारण न समजल्याने शेळ्यांचा आजारही वाढत गेला. दरम्यानच्या काळात आणखी ११ शेळ्यांचा मृत्यू झाला.सातपुते यांनी ३० आॅक्टोबरला कोल्हापूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात फोन केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सातपुते यांना उडवाउडवीची उत्तरे देत तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीस दाखवून शवविच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. अखेर सातपुते यांना कोणताही रिपोर्ट दवाखान्याकडून मिळाला नाही. शेवटी महिन्यांत २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. सातपुते यांना शेवटच्या क्षणापर्यंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. आजपर्यंत सातपुते यांच्या कुटुंबीयांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या उरलेल्या शेळ्या बचावतील का? या चिंतेत हे कुटुंबीय आहे. दरम्यान, आज, शुक्रवारी सातपुते यांनी संबंधित शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराबाबत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)४तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीचे विच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही सातपुते यांना अद्याप कोणताही अहवाल पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मिळालेला नाही.