शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महापालिकेचे २० कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: September 29, 2015 00:48 IST

शासनाचा निर्णय : सार्वजनिक बांधकामतर्फे कामे होणार; निधीवरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच झाली होती खडाजंगी

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच मंजूर केलेले २० कोटी रुपये सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासनादेशही नगरविकास विभागाने काढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने हा निधी दिल्याने त्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली होती. हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महापालिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार राज्यातील कोल्हापूर या एकमेव महापालिकेस हा निधी मंजूर झाला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच हा निधी मंजूर झाला. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी हे २० कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले होते. त्यावरून शिवसेनेही नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकाच आमदारास विकासकामासाठी वेगळा निधी कसा काय देतात, असे शिवसेनेचे म्हणणे होते. तोपर्यंत या निधीतून कोणती कामे करायची, याचे नियोजन शासकीय विश्रामधामवर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन राडा केला व अधिकाऱ्यांना पळवून लावले होते. इतका वादग्रस्त ठरलेला निधी नेमका ज्यादिवशी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्याचदिवशी वितरित झाला आहे.नगरसचिव विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी काढलेल्या शासन आदेशात त्यासंबंधी असे म्हटले आहे की, ‘या प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा शासनाचाच असेल. त्यामुळे २० कोटी रुपयांच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावी.या निधीसाठी कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग राहील. या निधीतून दुरुस्तीची कामे करता येणार नाहीत. या प्रकल्पांतंर्गत जी कामे होतील त्याचे त्रयस्थ यंत्रणेकडून लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असेल. हा निधी ३१ मार्च २०१७ पर्यंत खर्च करावयाचा आहे. निधीचे वितरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निधी कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करता येणार नाही. त्यामुळे या निधीतून राज्य शासनाची कोणतेही येणे रक्कम कपात करून घेता येणार नाही. या निधीतून जी विकासकामे करण्यात येणार आहेत त्यातून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही म्हटले आहे.पहिल्यांदा असे घडले...नगरविकास विभागाकडून शहर विकासासाठी दिला जाणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महापालिकेकडे देण्याची आजपर्यंतची प्रथा होती; परंतु आता पहिल्यांदाच महापालिकेला बायपास करून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे. पालकमंत्री हेच सार्वजनिक बांधकाममंत्री आहेत. हव्या त्या कंत्राटदाराला काम देणे सोपे व्हावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.