शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

इथेनॉलमुळे १९ हजार कोटींची बचत

By admin | Updated: July 22, 2016 00:50 IST

राजू शेट्टी यांची माहिती : ऊस शेतीला लाभ; तेल कंपन्यांद्वारे १२९ कोटी लिटरची मागणी

कोल्हापूर : ऊस पिकावर पाण्याच्या अतिवापराची टीका होत असताना इथेनॉलच्या तेलामध्ये मिश्रण करण्याच्या धोरणामुळे देशाची तब्बल १९ हजार कोटी रुपयांची बचत वर्ष २०१४-१५ मध्ये झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. इथेनॉलच्या वापरामुळे देशाला किती फायदा झाला, याबाबत संसदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली की, भारत सरकारकडून जुलै २०१३ पासून पूर्ण देशात पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम हाती घेतला व हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोनुसार तेल कंपन्यांना १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण धोरणानुसार तेलात मिश्रण करण्याची परवानगी दिली. देशात ज्या भागात इथेनॉल पर्याप्त उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पाच टक्के इथेनॉल तेलात मिश्रण करण्याची तेल कंपन्यांना सक्ती केली आहे. इथेनॉलची उपलब्धता वाढल्यावर टप्प्याटप्प्याने इथेनॉलच्या तेलात मिश्रणामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्धता वाढण्यासाठी इथेनॉलचा प्रतिलिटर दर ४८.५० ते ४९.५० रुपये करण्यात आल्याने त्याचा लाभ साखर उद्योगास होत असल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षात तब्बल १२९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी तेल कंपन्यांद्वारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे सरकारकडे वारंवार तेलामध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारद्वारे इथेनॉलचे तेलातील मिश्रण १० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला फायदा होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. वर्ष २०१४-१५ मध्ये इथेनॉलच्या तेलातील वापरामुळे देशाचे एकोणीस हजार कोटी रुपयांचे परकीय चलन बचत झाल्याने परकीय गंगाजळीमध्ये बचत झाली व एकार्थाने अर्थव्यवस्थेस फायदेशीर ठरले, असे शेट्टी यांनी सांगितले.