शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

इथेनॉलमुळे १९ हजार कोटींची बचत

By admin | Updated: July 22, 2016 00:50 IST

राजू शेट्टी यांची माहिती : ऊस शेतीला लाभ; तेल कंपन्यांद्वारे १२९ कोटी लिटरची मागणी

कोल्हापूर : ऊस पिकावर पाण्याच्या अतिवापराची टीका होत असताना इथेनॉलच्या तेलामध्ये मिश्रण करण्याच्या धोरणामुळे देशाची तब्बल १९ हजार कोटी रुपयांची बचत वर्ष २०१४-१५ मध्ये झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. इथेनॉलच्या वापरामुळे देशाला किती फायदा झाला, याबाबत संसदेत प्रश्न विचारला असता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली की, भारत सरकारकडून जुलै २०१३ पासून पूर्ण देशात पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम हाती घेतला व हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोनुसार तेल कंपन्यांना १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण धोरणानुसार तेलात मिश्रण करण्याची परवानगी दिली. देशात ज्या भागात इथेनॉल पर्याप्त उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पाच टक्के इथेनॉल तेलात मिश्रण करण्याची तेल कंपन्यांना सक्ती केली आहे. इथेनॉलची उपलब्धता वाढल्यावर टप्प्याटप्प्याने इथेनॉलच्या तेलात मिश्रणामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्धता वाढण्यासाठी इथेनॉलचा प्रतिलिटर दर ४८.५० ते ४९.५० रुपये करण्यात आल्याने त्याचा लाभ साखर उद्योगास होत असल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षात तब्बल १२९ कोटी लिटर इथेनॉलची मागणी तेल कंपन्यांद्वारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे सरकारकडे वारंवार तेलामध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारद्वारे इथेनॉलचे तेलातील मिश्रण १० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला फायदा होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. वर्ष २०१४-१५ मध्ये इथेनॉलच्या तेलातील वापरामुळे देशाचे एकोणीस हजार कोटी रुपयांचे परकीय चलन बचत झाल्याने परकीय गंगाजळीमध्ये बचत झाली व एकार्थाने अर्थव्यवस्थेस फायदेशीर ठरले, असे शेट्टी यांनी सांगितले.