शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

१८ जिल्हा जात पडताळणी’चे अध्यक्षपद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:48 IST

विश्वास पाटील/चंद्रकांत शेळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जातींच्या दाखल्यांची पडताळणी करणाऱ्या राज्यातील ३६ पैकी तब्बल १८ जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा फटका विद्यार्थी, नोकरदार आणि लोकप्रतिनिधींना बसत आहे.राज्यातील सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचे पद जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ...

विश्वास पाटील/चंद्रकांत शेळके ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जातींच्या दाखल्यांची पडताळणी करणाऱ्या राज्यातील ३६ पैकी तब्बल १८ जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने पडताळणीची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा फटका विद्यार्थी, नोकरदार आणि लोकप्रतिनिधींना बसत आहे.राज्यातील सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचे पद जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाले आहे. त्यात कोल्हापूर महापालिकेच्या १९ नगरसेवकांचा समावेश आहे.जातप्रमाणपत्र पडताळणीस विलंब का होतो, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. सन १९९६ मध्ये माधुरी पाटील (जि.ठाणे) विरुद्ध आदिवासी कल्याण विभाग या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात १५ विभागीय समित्या स्थापन झाल्या, परंतु शासनाने त्यांना पुरेसा स्टाफच दिला नाही. कर्मचाºयांअभावी जात पडताळणीस विलंबहोऊ लागला म्हणून २०१६ साली एकाने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. रिक्त असलेली १९० पदे तात्काळ भरावीत व पडताळणीचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार जिल्हास्तरीय समित्या स्थापन झाल्या; परंतु पदे भरण्याचा न्यायालयाचे आदेश सरकारने धाब्यावर बसविला. आजही १८ जिल्हा समित्यांची अध्यक्षपदे रिक्त आहेत. जिल्हास्तरीय समिती तीन सदस्यांची असते. हे निम्न न्यायिक स्वरूपाचे काम आहे. त्यामुळे तिन्ही सदस्य असल्याशिवाय दाखल्याची पडताळणी करून निकाल देता येत नाही. जात पडताळणीसाठी दररोज सुमारे ४,५०० अर्ज येतात. मात्र सदस्य संख्येअभावी समित्यांचे काम ठप्प आहे. याचाच फटका लोकप्रतिनिधींना बसला आहे.प्रमाणपत्र लागते कशासाठी..जातीचे प्रमाणपत्र शिक्षण, नोकरी व निवडणूक या तीन कारणांसाठी लागते. हे प्रमाणपत्र एकदा पडताळणी झाल्यावर ते त्याच व्यक्तीला आयुष्यभर वापरता येते. त्याच्या कुटुंबीयांनाही ते पुरावा म्हणून वापरता येते. दिल्या जाणाºया एकूण दाखल्यापैकी तब्बल ८० टक्के दाखले हे शैक्षणिक कामासाठी वापरले जातात. त्याचे नियंत्रण व समन्वय पुण्यातील बार्टी संस्थेकडून होतेजातपडताळणी संबंधी सोमवारीच पुणे विभागीय आयुक्तांकडे बैठक झाली. पडताळणी समितीची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि दाखले देण्यासाठी शासनाने शुल्क आकारावे; परंतु दाखले वेळेत द्यावेत अशी मागणी आम्ही केली आहे.राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघअध्यक्षपद रिक्त असलेले १८ जिल्हेसांगली, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव, बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली.१९ जिल्ह्यात सचिव पद रिक्तअध्यक्ष व सदस्य सचिव ही जातपडताळणी समितीची महत्त्वाची पदे आहेत; परंतु १९ जिल्ह्यात सदस्य सचिव हे पदही रिक्त आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर.जिल्हा अध्यक्ष १८संशोधन अधिकारी २४समिती सदस्य सचिव १९वरिष्ठ स्टेनो २२विधि अधिकारी २२