शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

३३६५४ चाचण्यांमध्ये १७२५ नागरिक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार ६५४ नागरिकांच्या विविध प्रकारे ...

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार ६५४ नागरिकांच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ १७२५ जण पॉझिटिव्ह आले असून हा पॉझिटिव्हिटी दर ५.१२ टक्के इतका होत आहे. हा दर कालच्या तुलनेत एक टक्क्यांनी वाढला आहे. याच पध्दतीने चाचण्या होत राहिल्यास काही दिवसात संख्या वाढून नंतर ती कमी होण्यास सुरूवात होईल असे प्रशासनाचे मत आहे.

चाचण्या वाढवल्याने रुग्ण वाढले असले तरी वाढलेली संख्या पाहून मात्र कोल्हापूरकरांच्या छातीत धस्स झाले. रुग्णसंख्येत चढउतार होत असल्याने जिल्हा प्रशासन व्यवहारावरील निर्बंध कितपत शिथिल करते हा प्रश्र्नच आहे. व्यापारी संघटना मात्र व्यवहार सुरू करण्यावर ठाम आहेत. कोल्हापूर शहरात ४०६, करवीर तालुक्यात ३८१ आणि हातकणंगले तालुक्यात २२१ नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ३५ मृत्यू झाले असून त्यातील सर्वाधिक आठ कोल्हापूर शहरातील आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

कोल्हापूर ०८

मंगळवार पेठ २, सुभाषनगर, राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, शहर, शुक्रवार पेठ, रामानंदनगर

करवीर ०६

दऱ्याचे वडगाव, शिंगणापूर, पाडळी खुर्द, आंबेवाडी २, उचगाव

हातकणंगले ०६

माणगाव, नागाव, कुंभोज, हेरले, हातकणंगले, कोरोची

पन्हाळा ०३

वाघवे, कोडोली, माले

राधानगरी ०२

चंद्रे, राधानगरी

कागल ०२

कागल, व्हन्नूर

शिरोळ ०२

दत्तवाड, धरणगुत्ती

आजरा ०२

शाहूवाडी ०१

आकुर्डे

इचलकरंजी ०१

गडहिंग्लज ०१

शेंद्री

चंदगड ०१

कुर्तनवाड

इतर १

निपाणी