शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur- ‘भुदरगड’च्या १.७३ लाख ठेवीदारांचे १७१ कोटी परत, कर्जाचीही वसुली

By राजाराम लोंढे | Updated: September 23, 2023 13:48 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना हळूहळू दिलासा मिळत असून अवसायक मंडळाने गेली पंधरा वर्षांत १ ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना हळूहळू दिलासा मिळत असून अवसायक मंडळाने गेली पंधरा वर्षांत १ लाख ६९ हजार ठेवीदारांची १७१ कोटींची रक्कम परत केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवीचे वाटप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीचे वाटप सुरू असले तरी अवसायक मंडळाने सर्वच्या ठेवींच्या मुद्दलच्या १० टक्के रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत २५५ कोटींपैकी ११५ कोटी कर्जाची वसुलीही झाली आहे.पुण्यातील ‘डीएसकेडीएल’ कंपनीच्या अवसायकांनी दीड हजार ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांत ५२ शाखांच्या माध्यमातून विस्तार असलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेवर २००७ मध्ये अवसायक मंडळ आले. त्यानंतर आतापर्यंत अवसायक मंडळाने न्यायालयाच्या आदेशास आधीन राहून वसुली व ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत.

उच्च न्यायालयाने एकीकडे वसुलीची प्रक्रिया राबवत असताना पहिल्यांदा १० हजारांपर्यंत व नंतर २० हजारांपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘केवायसी’ पूर्तता करून रक्कम घेऊन जाण्याचे आवाहन अवसायक मंडळाने केले. त्यानुसार २० हजारांपर्यंत रक्कम असलेल्या ८० टक्के ठेवीदारांनी रक्कम परत घेतली आहे. उर्वरित ठेवीदार आलेले नाहीत. त्यामुळे अवसायकांनी न्यायालयाची परवानगी घेऊन वीस हजारांवरील सर्वच ठेवीच्या मुद्दल रकमेपैकी १० टक्के परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर अखेर घेणे-देणे पूर्ण करावे लागणारमुळात अवसायक मंडळाची मुदत संपली आहे, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण घेणे-देणे पूर्ण करण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत.

संस्था अडचणीत येण्यास ही आहेत कारणे :

  • आर्थिक अनियमितता
  • संचालक मंडळाचा गैरकारभार
  • विना तारण मोठ्या कर्जांचे वाटप

संचालकांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित

संस्थेवर अवसायक मंडळ आल्यानंतर कारभाराला जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळावर जबाबदारीही निश्चित करण्यात आली. त्यानुसार संचालक व अधिकारी अशा ४८ जणांवर ४६ कोटींची जबाबदारी निश्चित केली असून त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रियाही सुरू आहे.दृष्टिक्षेपात ‘भुदरगड’ पतसंस्था :

  • स्थापना : १९७७
  • कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, सांगली.
  • शाखा : ५२
  • अडचणीत आली : २००२
  • अवसायक मंडळ नेमणूक : २००७

ठेवीदारांसाठी यांची चिकाटी : विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, सहायक निबंधक प्रदीप मालगावे, सहायक निबंधक युसूफ शेख, व्यवस्थापक अनंत नाईक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर