शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

१६९ कोटींची मागणी गैर

By admin | Updated: September 25, 2014 01:29 IST

हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले

कोल्हापूर : ‘आयआरबी’ने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे ‘२८ सप्टेंबर २०११ ते १५ जून २०१४ पर्यंत विविध कारणांनी टोलवसुली बंद राहिल्याने १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा झालेला तोटा भरून द्यावा,’ असा दावा केला आहे. हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले,’ असा दरोडेखोराने योजलेला अंदाज आहे, अशा शब्दांत ‘आयआरबी’च्या मागणीची खिल्ली उडविली. टोलवसुलीच बेकायदेशीर आहे; त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच येत नाही, असा दावा अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी केला. आज, बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात दोघे बोलत होते. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही राज्य शासन व न्यायालयाने दिलेली टोलवसुलीस स्थगिती, आंदोलन व कायदा सुव्यवस्थेमुळे टोलवसुलीवर झालेला परिणाम यांमुळे टोलवसुलीत १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तोट्याची रक्कम तर द्या किंवा या रक मेच्या भरपाईसाठी टोलवसुलीची मुदत तरी वाढवा, अशा आशयाची नोटीस ‘आयआरबी’ने १७ सप्टेंबर २०१४ रोजी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना बजावली आहे. या नोटिसीचा व ‘आयआरबी’च्या मागणीचा एन. डी. पाटील व पानसरे यांनी खरपूस समाचार घेतला.पानसरे म्हणाले, आयआरबी बेकायदेशीर टोलवसुलीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच बिनबुडाची अवाजवी मागणी करीत आहे. मूल्यांकन समितीच्या अहवालाबाबत कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच टोलची स्थगिती उठवू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती समितीला दिले होते. मात्र, ५ जानेवारी २०१२ रोजी दिलेली स्थगिती परस्परच १३ मे २०१३ रोजी उठविली गेली. दरम्यान, कृती समितीशी ना चर्चा केली, ना मूल्यांकनाचा अहवाल जाहीर केला. कोणत्या कारणावरून स्थगिती दिली व उठविली याचे नेमके उत्तर राज्य शासनाकडे नाही. त्यामुळे कोणीही, कितीही नुकसानीचा कांगावा केला तरी कोल्हापूरकरांना विचार करण्याची गरज नाही. मूल्यांकनाचा अहवाल कोल्हापूरच्या बाजूने असल्यानेच तो लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी) गांधी जयंतीदिवशी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’टोलविरोधी कृती समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. कृती समितीच्या व्यासपीठाचा राजकीय वापर न करता निवडणूक काळातही टोल आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आज, बुधवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. २ आॅक्टोबरला गांधीजयंती दिवशी फुलेवाडी, शिये, शिरोली व शाहू या टोलनाक्यांवर सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्याची घोषणा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी केली. मेळाव्यात कृती समितीची निवडणूक काळातील आंदोलनाची दिशा ठरल्याने प्रचाराच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे.राजारामपुरीतील अप्पाज कॉम्प्लेक्स येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निवडणूक काळात आंदोलन सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मेळावा झाला. यावेळी वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.पानसरे म्हणाले, येत्या सोमवारी (दि. २९) टोलबाबतचा सर्वाेच्च न्यायालयात काहीही निकाल लागो. कोल्हापूरकर टोल देणार नाहीत.