शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

ऊसतोडणी मजुरांची १५ दिवसांची डेडलाईन

By admin | Updated: November 24, 2014 23:59 IST

साखरेच्या दरात घसरण : दरवाढीस कारखानदारांची असमर्थता

कोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतूक दरवाढीबाबत राज्य सरकारला पंधरा दिवसांची डेडलाईन दिली आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ स्थापनेची घोषणा करून सरकारने सकारात्मक पावले उचलली तरी साखरेचे दर घसरल्याने दरवाढीस कारखानदारांनी असमर्थता दर्शविल्याने दरवाढीचा पेच निर्माण झाला आहे. ऊसतोडणीचा दर ३५० रुपये करा व वाहतुकीमध्येही दुप्पट दरवाढ करण्याची मागणी राज्य ऊस तोडणी, वाहतूक संघटनेने सरकारकडे केली आहे. याबाबत शासनपातळीवर बैठका झाल्या, पण दराबाबत काहीच निर्णय होऊ शकला नाही. राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे, पण सगळ्यांच्या नजरा तोडणी-वाहतूक दराकडे लागल्या आहेत. सध्या प्रतिटन १९० रुपये १६ पैसे दर आहे. २००५ ला झालेल्या करारावेळी ३५ टक्के, तर मागील करारावेळी ७० टक्के दरवाढ दिली होती. आता किमान ५० टक्के दरवाढीसाठी संघटना आग्रही राहण्याची शक्यता आहे. साखरेचे दर घसरल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना दर देताना कारखान्यांची दमछाक होणार आहे. त्यात प्रतिटन शंभर रुपये तोडणी व त्यापटीत वाहतुकीची दर वाढ करणे आवाक्याबाहेर असल्याचे कारखानदारांचे मत आहे. तोडणी व वाहतूक दरवाढीचा करार तीन वर्षांनी होणार असल्याने आताच योग्य दरवाढ मिळाली नाहीतर तीन वर्षे फटका बसणार आहे. त्यामुळे संघटनेने सरकारला पंधरा दिवसाची मुदत दिली आहे. या कालावधीत सरकारने निर्णय घेतला नाही, तर ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिला आहे.