शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

जिल्हा बँकेकडे सेवा संस्थांचे १४६ कोटी अडकले

By admin | Updated: September 22, 2015 23:54 IST

जिल्ह्यात १८५६ सेवा संस्था : भागभांडवलावर गेल्या सहा ते सात वर्षांपासून लाभांश नाही

 प्रकाश पाटील - कोपार्डे -पीक कर्जासाठी सेवा संस्थांना पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकेकडून एकूण कर्जावर भागभांडवल म्हणून पाच टक्के रक्कम घेतली जाते. या भागभांडवलापोटी जिल्ह्यातील १८५६ संस्थांचे १४६ कोटी ६९ लाख रुपये जिल्हा बँकेत अडकले आहे. यावर लाभांशही मिळत नसल्याने सेवा संस्थांचे पाय खोलातच जात असल्याचे मत सहकारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्प दरातील कर्जाचा पुरवठा करण्यासाठी त्रिस्तरीय पद्धत आहे. ‘नाबार्ड पीक कर्जासाठी जिल्हा बँकांना पतपुरवठा करते, तर जिल्हा बँका सेवा संस्थांना पतपुरवठा करतात. सेवा संस्थांमार्फत खातेदार सभासदांना प्रतिएकर ३४ हजार रुपये दिले जातात. एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी, तर एक ते दोन लाखाला दोन टक्के व दोन लाखांवरील पीक कर्जाला चार टक्के व्याज आकारणी होते. पंजाबराव देशमुख कृषी कर्ज व्याज सवलतीतून शेतकऱ्यांना परतावा केला जातो. यामुळे सेवा संस्थेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून, सेवा संस्थेच्या तोट्यात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ९६५ संस्था तोट्यात गेल्या आहेत, तर ८७२ संस्थाच नफ्यात आहेत.सेवा संस्था शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना जिल्हा बँकेच्या नियमानुसार एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम भागभांडवल म्हणून कपात करतात. ही वर्षानुवर्षे सुरू असलेली कपात यावर्षीच्या अहवाल सालात १४६ कोटी ६९ लाखांवर पोहोचली आहे. गेली सहा ते सात वर्षे यावर एक पैसाही लाभांश या संस्थांना जिल्हा बँकेने दिलेला नसून कोट्यवधींची रक्कम बिनव्याजीच वापरली जाते. त्यामुळे तोट्यातील संस्थांना संजीवनी द्यायची असेल तर या रकमेचा केवळ सहा टक्के लाभांश काढला तरी नऊ ते दहा कोटी रुपये सेवा संस्थांना मिळणार आहेत. मात्र, तोट्यात असलेल्या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे कारण पुढे करून लाभांश देता येत नाही, हे कारण सांगणाऱ्या जिल्हा बँक प्रशासनाकडून इतर खर्चासाठी (त्याची वर्गवारी नाही) एक कोटी ७९ लाख ४५ हजार १0 रुपये खर्च होतात. यावेळी रिझर्व्ह बँकेचे नियम कुठे जातात? असा प्रश्न संस्थाचालकांतून विचारला जात आहे. तुमच्या चैन्या; मात्र शेतकऱ्यांना उत्तरे देताना आमचा जीव गुदमरतोय, अशी प्रतिक्रिया एका सचिवाने आपले नाव जाहीर न करण्याच्या बोलीवर दिली. जर लाभांश दिला गेला तर किमान नोकरांचे पगार व स्टेशनरी तरी भागवता येईल. तसेच संस्थांना थोडातरी दिलासा मिळेल, असेही सांगण्यात आले.सहकारी सेवा संस्था जिल्हा बँकेकडून कर्ज घेताना भागभांडवल वसूल करते. मात्र, यावर लाभांश दिला जात नाही. इतर राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतल्यास सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळते. जिल्ह्यातील सेवा संस्थांचे कोट्यवधी रुपये विनाकारण भागभांडवलच्या नावाखाली जिल्हा बँकेत पडून आहेत. यावर बँक आपलाच व्यवसाय करत आहे.- एन. सी. पाटील, अध्यक्ष, हनुमान विकास सेवा संस्था पाटपन्हाळा, ता. पन्हाळा