शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:32 IST

अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.

ठळक मुद्दे‘राजर्षी शाहू शिष्यवृत्ती’पासून राहणार १३ हजार विद्यार्थी वंचितअर्जात त्रुटी, कागदपत्रे अपुरी; शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती

संतोष मिठारीकोल्हापूर : अपुरी कागदपत्रे आणि अर्जांतील त्रुटींमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १३ हजार ९५२ विद्यार्थी हे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’पासून वंचित राहणार आहेत. दोन आठवड्यांत त्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, तर त्यांना या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शासनाने केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज भरले. कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे आतापर्यंत ५४ हजार १७ अर्ज दाखल झाले. त्यांंपैकी ४० हजार ६५ अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित १३ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.

अर्जासमवेत अपुरी कागदपत्रे जोडणे, अर्ज भरताना झालेल्या त्रुटी ही कारणे आहेत. ज्या अभ्यासक्रमांना संबंधित योजना लागू नाही, अशा काही विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज केले आहेत. या शिष्यवृतीबाबत विद्यार्थी, महाविद्यालयात शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण सहसंचालक कार्यालय, शिवाजी विद्यापीठाने गेल्या सहा महिन्यांपासून महाविद्यालय, विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये मार्गदर्शन शिबिर घेतले. त्याचा परिणाम म्हणजे यावर्षी संबंधित योजनेसाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली.विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यांनी दि. ३१ जानेवारीपूर्वी महाविद्यालयांमध्ये संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.

आकडेवारी दृष्टिक्षेपातजिल्हा          भरलेले अर्ज (हजारांत)             पात्र ठरलेले अर्जकोल्हापूर              २१,१९७                            १५६८०सांगली                १३२५९                              १०२१४सातारा                १९५६१                             १४१७१योजना आहे अशीया योजनेअंतर्गत शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह), खासगी विनाअनुदानित (खासगी अभिमत, स्वयं अर्थसाहाय्य विद्यापीठे वगळून) महाविद्यालये अथवा तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना (व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशित विद्यार्थी वगळून) शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये सवलत मिळते. त्यात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

सहसंचालक कार्यालय, विविध महाविद्यालये, शिवाजी विद्यापीठाने संयुक्तपणे प्रयत्न केल्याने या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज वाढले आहेत. पात्र ठरलेले अर्ज मान्य करून उच्च शिक्षण संचालनालयाला पाठविले आहेत. ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत. ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीपूर्वी त्यांची पूर्तता करावी.उच्च शिक्षण सहसंचालक, कोल्हापूर - डॉ. अजय साळी, विभाग.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर